ब्रेकिंग न्यूज
पिसगाव येथे मिस्त्री कामगाराची गळफास घेऊन आत्महत्या Dhiraj Pardeshi Case Update | धीरज परदेशी प्रकरणी पोलिसांची कारवाई | Ahilyanagar Crime News पावसाळ्यात जनावराच्या तोंडाला अन् जिभेवर फोड, असू शकतो गंभीर आजराचा धोका, अशी घ्या काळजी वाह रे मित्र…! घरी आला, खाल्लं, पिलं अन् जाता जाता…, कोल्हापूर पोलिसांनी 24 तासांत उचललं महाआवास अभियानात प्रतीक्षा गाडगे यांची दमदार कामगिरी Shravan Astrology: श्रावणात ग्रह फिरले, कुणाला संधी तर कुणावर संकट. मेष ते मीन राशीवाले काय काळजी घ्याल? खर्च कमी अन् मिळेल भरघोस उत्पन्न, गट शेती ठरेल फायद्याची, कृषी तज्ज्ञांनी दिला महत्त्वाचा सल्ला, Video Agniveer-Bharti-2026: भावांनो, लागा तयारीला…! कोल्हापुरात 14 सप्टेंबरपासून अग्निवीर भरती, कुणाला संधी? CRIME : रात्री बायकोसोबत ‘आखाड पार्टी’ केली अन् सकाळी शुद्धीत येताच डोक्यात कुकरचं झाकण घालून संपवलं! शिक्ष… Maratha OBC Reservation: मराठा आरक्षणाचा वाद पुन्हा पेटणार? जरांगेंच्या आक्रमकतेला उत्तर देण्यासाठी OBC सम…
SP News Maregaon

विधान परिषदेत अर्ज भरताना महायुतीत बंडखोरी:भाजप आणि शिवसेना नेत्यांशी समन्वयाची चर्चा करणार, सुनील तटकरेंची प्रतिक्रिया

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


महाराष्ट्रातील स्थानिक संस्थांच्या विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी सोमवारी अर्ज भरण्यात आले आहेत. अनेक ठिकाणी बंडखोरी झाल्याचे पाहायला मिळाले. यावर राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटाचे नेते सुनील तटकरे यांनी भाष्य केले आहे. तसेच बंडखोरीबाबत रवींद्र चव्हाण यांच्यासोबत चर्चा झाल्याची माहिती त्यांनी दिली आहे. सुनील तटकरे म्हणाले, महायुतीमधल्या इतर पक्षांनी अधिकृत उमेदवारांच्या संदर्भात अर्ज भरले असतील तर त्या संदर्भातली चर्चा रवींद्र चव्हाण यांच्यासोबत झाली. कोकण मतदारसंघात सुद्धा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाला ही जागा मिळत असतानाच जसे मी काल देवेंद्रजींचा उल्लेख केला, उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेंचा उल्लेख केला तसा चव्हाण साहेबांचे सुद्धा भाजप पक्षाचे प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांचाही त्यात सहकार्य लाभले होते. आज ही चर्चा, आजची भेट ही सदिच्छा भेट होतीच, त्याचसोबत या निवडणुका एकमताने सामोरे जात असताना त्यात सामंजस्य कसे करता येईल, याची चर्चा केली. जिथे बंडखोरी झाली तिथले अर्ज मागे घेतले जातील अनेक ठिकाणी राष्ट्रवादी विरुद्ध महायुतीमधला घटक पक्ष अशी परिस्थिती दिसत आहे. तसेच अनेक ठिकाणी बंडखोरी देखील झाली. यावर बोलताना सुनील तटकरे म्हणाले, बऱ्यापाकी ठिकाणी अशीच स्थिती आहे. मला विश्वास आहे की ज्यावेळेला तीन नेतृत्व या संदर्भातला निर्णय करेल, जो झालाच आहे, त्या अर्थी देशातल्या केंद्रीय नेतृत्वाने या संदर्भातील अनुमती दिल्याच्या नंतर ज्या ठिकाणी अशा पद्धतीचे अर्ज दाखल केले असतील तर ते अर्ज मागे घेण्याच्या दृष्टिकोनातून मार्ग निघेल. भरत गोगावलेंनी अनिकेतला फोन करून शुभेच्छा दिल्या आज भाजपच्या नेत्यांची भेट घेतली, तसेच आज अजून शिवसेनेतील कोणत्या नेत्यांना भेटणार आहात? या प्रश्नावर सुनील तटकरे म्हणाले, एकतर काल अर्ज भरायला आमदार उदय सामंत होते, दीपक केसरकर होते, आमदार महेंद्र थोरवे होते, आमदार भरत गोगावले सुद्धा येणार होते, पण त्यांचा वाढदिवस होता. त्यांनी सकाळीच अनिकेतला फोन करून शुभेच्छा दिल्या. आज मंत्रिमंडळाच्या बैठकीच्या निमित्ताने आम्ही सर्वच मुंबईत आहोत, त्यामुळे आज आम्ही विविध मुद्यांवर चर्चा करणार आहोत. महायुतीचे उमेदवार निवडून येतील महेंद्र दळवी यांच्या मुलीचा अजूनही अर्ज आहे, यावर बोलताना सुनील तटकरे म्हणाले, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आधी चर्चा झाली होती. जसे मी सांगितले उदय सामंत, दीपक केसरकर तसेच शिवसेनेचे इतर नेते अर्ज भरताना होते. तेवढ्यावरच सीमित न राहता महायुतीचे उमेदवार निवडून येतील, असे तटकरे यांनी म्हटले आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर