ब्रेकिंग न्यूज
Maratha OBC Reservation: मराठा आरक्षणाचा वाद पुन्हा पेटणार? जरांगेंच्या आक्रमकतेला उत्तर देण्यासाठी OBC सम… India Vs Sri Lanka : ‘सरफराज खानला क्लियारिटी द्या…’, गंभीरला झापलं! मुंबईकर खेळाडूसाठी मैदानात उतरला 765… Chandrapur : खेळता खेळता बाळाने ट्यूबचं टोपण गिळलं,कुटुंबियांच्या काळजाचा ठोका चुकला, पुढे काय घडलं? उभ्या ट्रकला दुचाकीची मागून जोरदार धडक; तरुण गंभीर जखमी मारेगावच्या वारंवार वीजखंडितीविरोधात नागरिक आक्रमक; सात दिवसांचा अल्टिमेटम Kolhapur: चारित्र्याचा संशय, गाडीवरून जातानाच बिनसलं, पतीनं…, भरदिवसा कोल्हापूरच्या रस्त्यावर थरार Konkan Railway: कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी गुड न्यूज, विशेष रेल्वेला अतिरिक्त थांबे, पण कुठे? पतीच्या व्हॉट्सॲपवरून नंबर घेतला, त्याला अडचण सांगितली, 26 वर्षांच्या विवाहितेला ‘ती’ चूक भोवली, छ. संभाजी… FDA News | अन्नाच्या नावाखाली काळा धंदा! FDA कडून पर्दाफाश | Tukaram Mundhe News | Special Report Satish Maratha Murder : ‘प्रत्येक चौकात मीच टिकणार…’, सतीश मराठावर 39 सपासप वार करण्याआधी राहुलचा शेवटचा …
SP News Maregaon

साधुग्रामसाठी झाडे तोडणे कोणत्या संस्कृती बसते?:वकील असीम सरोदेंचे सरकारला खुले पत्र; देशावर प्रेम करण्याचा उपरोधिक सल्ला

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


वकील असीम सरोदे यांनी नाशिक कुंभमेळ्यासाठी करण्यात येणाऱ्या अमाप वृक्षतोडीवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारवर निशाणा साधला आहे. पर्यावरणस्नेही व निसर्गासोबत जीवन जगणे ही मानवी व सनातन धर्माची संस्कृती आहे. त्यामुळे साधूग्राम बांधण्यासाठी वाढलेले वृक्ष तोडण्याची योजना कोणत्या संस्कृती बसते? असे ते म्हणालेत. यावेळी त्यांनी सरकारला देशावर प्रेम करून पाहण्याचा उपरोधिक सल्लाही दिला. नाशिक येथे येत्या ऑक्टोबर महिन्यापासून सिंहस्थ कुंभमेळ्याला सुरुवात होणार आहे. त्याची सध्या जय्यत तयारी सुरू आहे. यात साधूग्राम तयार करण्यासाठी तपोवनातील वृक्षतोड केली जात आहे. या प्रकरणी सरकारला मोठ्या टीकेला सामोरे जावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर वकील असीम सरोदे यांनी सरकारला खुले पत्र लिहून नाहक वृक्षतोड टाळण्याचा सल्ला दिला आहे. खाली वाचा असीम सरोदेंचे पत्र जशास तसे… असीम सरोदे आपल्या पत्रात म्हणतात, कुंभमेळ्यासाठी वृक्षवल्ली कापण्यावर राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाची स्थगिती. मागील वेळी सुद्धा स्थगिती दिली होती पण कायद्याची प्रक्रिया न करता झाडे कापू नयेत असे म्हटल्याचा गैरफायदा तुम्ही घेतला आणि कागदोपत्री बोगस, दिखाऊ प्रक्रिया करून मोठ्ठाली वृक्ष जमिनीवर लोळवलीत. यावेळी मात्र स्पष्ट स्थगिती आहे कि पुढील तारखेपर्यंत झाडांना तोडायचे नाही. साधुग्राम बांधण्यासाठी वाढलेले वृक्ष तोडण्याची योजना कोणत्या संस्कृतीत बसते? पर्यावरणस्नेही व निसर्गासोबत जीवन जगणे ही आहे मानवी संस्कृती आणि सनातन धर्मसुद्धा. तुम्हाला वाढलेल्या वृक्षांपेक्षा महत्वाचा कुंभमेळा वाटतो? मग घ्या ना कुंभमेळा पण त्यासाठी वृक्षराजी आणि पर्यावरणावर करवती का चालविता? तुम्हाला लागलेला भव्यतेचा ‘नाद’ मानवी जीवनावर पर्यावरणाचा प्रकोप घडवेल. साहेब, तुम्हीच कट्टर हिंदुत्ववादी असे तुमच्या मनात नेहमी असते आणि आता तर तुम्ही योगी आदित्यनाथ यांच्याशी त्यांच्यापेक्षा जास्त कट्टर हिंदुत्ववादी अशी स्वयंघोषित स्पर्धा सुरु केलीय, त्या राजकीय कारणांसाठी तुम्हाला नाशिकचा कुंभमेळा भव्य करायचा आहे बस्स. कृपया बंद करा हे विघातक राजकारण. माणसांनी राजकारणासाठी भांडणे, एकमेकांना संपविणे आम्ही खूप बघितले लोकल चाणक्य साहेब. तुमचे राजकारणाचे व पैशांचे हिशोब, निसर्ग- पर्यावरणापासून दूर ठेवा इतकीच नम्र विनंती. निसर्ग, पर्यावरण काहीच म्हणणार नाही, बोलणार नाही, विरोध करणार नाही पण जेव्हा निसर्ग निषेध करेल तेव्हा मानवी जमात होरपळून निघेल, कचऱ्यासारखी पाण्यात वाहून जाईल किंवा थंडीने रक्त गोठून मरेल आणि तेव्हा तुम्ही, अभिजन-महाजन, साधू-महंत, फादर-मौलवी कुणीही वाचवू शकणार नाही. त्यामुळे सत्ता असण्याची अकड कमीच करा. जनतेचा पैसा खर्च करण्याची प्राथमिकता व प्राधान्यक्रम तुम्ही चुकविताय साहेब. देशावर या भारतभू वर प्रेम करणे सोप्पे नाही. येथील निसर्ग व पर्यावरणाचे मारेकरी म्हणजे देशाचे गद्दारच. बघा ना देशावर प्रेम करून. प्रयत्न केला तर जमेल, असे असीम सरोदे यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे. अशोक खरात विशेष सरकारी वकील होण्याचा प्रस्ताव उल्लेखनीय बाब म्हणजे असीम सरोदे यांनी नाशिकच्याच भोंदू अशोक खरात प्रकरणात विशेष सरकारी वकील होण्याचीही तयारी दर्शवली आहे. ते म्हणाले होते, भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात सरकारी वकील म्हणून जबाबदारी घेण्यासाठी कुणी मिळत नाहीये ही बातमी वाचली. आमचे मित्र अजय मिसार सरकारतर्फे महाराष्ट्रातील अनेक केसेसमध्ये व्यस्त असल्याने असेल कदाचित त्यांनी खरात केसमध्ये सरकारी वकील म्हणून जबाबदारी घेण्यास नकार दिला आहे. ‘वैसे तो मै बहोत प्रभावित हु आपसे’ फेम एकमेव विशेष म्हणून स्वतःला प्रस्थापित केलेले महोदय दिल्ली सभेत जाऊन बसले. पण तरीही मीच विशेष सरकारी वकील म्हणून केसेस चालविणार असा त्यांचा हट्ट असतो. त्यांना सरकारने विचारून बघावे. ते कायदा व फायदा दोन्ही बाजूंनी विचार करू शकतात. खरात सारख्या भोंदू बाबालाच नाही तर अश्या प्रवृत्ती नेस्तनाबूत करायच्या असतील तर खरात विरोधातील या केसमध्ये ‘विशेष सरकारी वकील’ म्हणून काम करण्याची माझी तयारी आहे. पण विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्याचे राजकारण आहे. ‘ यात राजकारण आणू नका’ म्हणणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या मनात जे राजकारण असेल त्यालाच ‘राज्याचे धोरण’ म्हणण्याचा प्रघात आहे, असे ते म्हणालेत.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर