अकोट- शेगाव मार्गावरील अंदुरा फाट्याजवळ रस्त्यावर पडलेल्यामोठ्या भेगांमुळे झालेल्या भीषण अपघातात अकोट येथील दोन युवकांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना रविवारी दुपारी घडली. जिल्ह्यातील निकृष्ट दर्जाच्या रस्त्यांचा मुद्दायानिमित्ताने पुन्हा ऐरणीवर आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कुणालराजेश भोरे (२२) व श्रीकांत पुरुषोत्तम बायस्कर (२२) हे दोघे युवक अकोट शहरातील श्रीहरी हॉटेलच्या मागील परिसरात राहणारे होते. ते शेगाव येथेदर्शन करून दुचाकीने अकोटकडे परतयेत होते. दरम्यान अकोट-शेगाव मार्गावरील अंदुरा फाट्याजवळ त्यांच्या दुचाकीचा भीषण अपघात झाला.घटनेची माहिती मिळताच उरळ पोलिस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारीतातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेहताब्यात घेतले व पुढील कार्यवाहीसाठी अकोट ग्रामीण रुग्णालयात पाठवले.दोन्ही युवकांचे शवविच्छेदन अकोटग्रामीण रुग्णालयात करण्यात आले.दरम्यान, या घटनेमुळे अकोट शहरातशोककळा पसरली आहे. सराफाव्यावसायिक असलेले राजू भोरे यांनाएक मुलगा व मुलगी आहे. कुणाल हामोठा मुलगा होता. तर पुरुषोत्तमबायस्कर यांना दोन मुले असून श्रीकांतहा धाकटा मुलगा होता. अॅनालिसिस: बसखाली आल्याने दुखापत
प्रत्यक्षदर्शींकडून मिळालेल्या माहितीनुसार, रस्त्यावर अनेक ठिकाणीमोठमोठ्या भेगा पडलेल्या आहेत. याचभेगांमधून दुचाकी घसरल्यानेवाहनावरील नियंत्रण सुटले. त्याचवेळीअकोटहून संभाजीनगरकडे जातअसलेली चांदूरबाजार आगाराची एस. टी.बस समोरून येत होती. दुचाकीस्वारबसच्या चाकाखाली आल्याने दोघांच्याडोक्याला गंभीर दुखापत झाली. अपघातइतका भीषण होता की दोघांचाहीघटनास्थळीच मृत्यू झाला.
