Shopping Cart
Total:

$0.00

Items:

0

Your cart is empty
Keep Shopping

अशोक खरातचा एन्काउंटर होण्याची शक्यता:प्रणिती शिंदेंचा आरोप; सत्ताधाऱ्यांची नावं उघड होण्याची भीती? राजकीय वर्तुळात खळबळ

नाशिकमधील अशोक खरात प्रकरणावरून आता राजकीय वातावरण तापलं आहे. काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी या प्रकरणात अत्यंत गंभीर आरोप करत खळबळ उडवून दिली आहे. अशोक खरातचा एन्काउंटर होण्याची शक्यता असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला आहे. त्यांच्या मते, या प्रकरणात अनेक प्रभावशाली लोकांची नावे समोर येण्याची शक्यता असून, ती बाहेर येण्यापूर्वीच त्याला संपवण्याचा प्रयत्न होऊ शकतो. या विधानामुळे राज्यातील राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त अभिवादन केल्यानंतर माध्यमांशी बोलताना प्रणिती शिंदे यांनी हा गंभीर आरोप केला. त्या म्हणाल्या की, अशोक खरात प्रकरण केवळ एका व्यक्तीपुरते मर्यादित नसून, यामध्ये सत्ताधारी पक्षातील काही नेते आणि मंत्र्यांचीही नावे समोर येऊ शकतात. त्यामुळे या सर्व गोष्टी उघड होण्याआधीच त्याचा एन्काउंटर केला जाऊ शकतो, अशी भीती त्यांनी व्यक्त केली. त्यांच्या या विधानामुळे प्रकरणाला आणखी राजकीय रंग चढला आहे. खरातच्या सोलापूर जिल्ह्यातील जमिनींबाबत बोलताना शिंदे यांनी आणखी गंभीर आरोप केले. त्यांनी सांगितले की, या प्रकरणात सरकारमधील काही मंत्री, अधिकारी आणि अशोक खरात यांच्यात थेट संगनमत असल्याची शक्यता आहे. काही महत्त्वाचे पुरावे लवकरच बाहेर येऊ शकतात, मात्र त्याआधीच परिस्थिती बदलवण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो, असे त्यांनी सूचित केले. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. दरम्यान, रुपाली चाकणकर यांच्या बहिणी प्रतिभा चाकणकर यांनी त्यांच्या नावावर असलेली बँक खाती बनावट असल्याचा दावा केला आहे. यावर प्रतिक्रिया देताना प्रणिती शिंदे यांनी सांगितले की, यासंदर्भात काही पुरावे समोर आल्याची माहिती आहे. त्यांनी पुढे महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा उपस्थित करत सरकारवर जोरदार टीका केली. एकीकडे महिला आरक्षणाबद्दल बोललं जातं, पण दुसरीकडे महिलांवर अत्याचार होत असतील तर ते अत्यंत गंभीर आहे, असे त्या म्हणाल्या. वर्षभर महापुरुषांचे विचार जपले पाहिजेत याचवेळी त्यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या विचारांनाही समर्थन दिले. जयंती किंवा पुण्यतिथीच्या निमित्ताने केवळ मिरवणुका काढण्यापेक्षा महापुरुषांचे विचार आचरणात आणण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. त्या म्हणाल्या की, माझ्याकडे वर्गणी मागायला येतात, पण मी पैसे देत नाही. त्याऐवजी काही उपयुक्त वस्तू देण्याचा प्रयत्न करते. समाजात वर्षभर महापुरुषांचे विचार जपले गेले पाहिजेत, असेही त्यांनी स्पष्ट केले. महिला आरक्षणाच्या मुद्द्यावर निशाणा साधला संविधान आणि लोकशाहीच्या मुद्द्यावरही त्यांनी केंद्र सरकारवर टीका केली. त्या म्हणाल्या की, देशात सध्या संविधान धोक्यात असल्याची भावना निर्माण झाली आहे. त्यामुळे जात, धर्म, पंथ बाजूला ठेवून संविधान वाचवण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे. महिला आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलताना त्यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला. 2023 मध्ये विधेयक मंजूर झाल्यानंतर तीस महिन्यांनी सरकारला त्याची आठवण झाली, असा टोला त्यांनी लगावला. लोकशाही परंपरा मोडण्याचा प्रकार तसेच, महिला आरक्षण लागू करण्यासाठी जनगणना आणि मतदारसंघ पुनर्रचनेचा मुद्दा पुढे आणणे योग्य नसल्याचेही त्यांनी सांगितले. विरोधकांना विश्वासात न घेता एकतर्फी निर्णय घेतले जात असल्याचा आरोप करत त्यांनी लोकशाही प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित केले. ही पद्धत म्हणजे लोकशाही परंपरा मोडण्याचा प्रकार आहे, असे म्हणत त्यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला. त्यांच्या या सर्व विधानांमुळे अशोक खरात प्रकरण आता केवळ गुन्हेगारी न राहता मोठा राजकीय मुद्दा बनण्याची चिन्हे दिसत आहेत.

Read Also:
0
Show Comments (0) Hide Comments (0)
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest
0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
Recent Posts:
error: Content is protected !!