वेगवेगळ्या गुन्ह्यांमुळे कायम चर्चेत असणाऱ्या बीड जिल्ह्यात आता आई-मुलाच्या पवित्र नात्याला काळीमा फासणारी एक घडली आहे. या घटनेत एक महिला आपल्या सावत्र मुलासोबत फरार झाली असून, यामुळे सामाजिक व कौटुंबिक नैतिक मूल्यांवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. बीड जिल्ह्यात काही दिवसांपूर्वी पत्नी माहेरी गेल्यामुळे एका व्यक्तीने आपल्या 13 वर्षीय मुलीवर अत्याचार केल्याची गंभीर घटना घडली होती. त्यानंतर आता उपरोक्त संतापजनक घटना घडली आहे. यासंबंधीच्या माहितीनुसार, केज तालुक्यातील एका गावातील एका व्यक्तीला 2 मुले व 2 मुली आहेत. त्याच्या दोन्ही मुलींची लग्ने झाली आहेत. या व्यक्तीची पत्नी सततच्या वादामुळे मागील 15 वर्षांपासून नवऱ्याला सोडून माहेरी राहते. तर तिची दोन्ही मुले आपल्या वडिलांसोबत राहून शेती करतात. कौटुंबिक कारणांमुळे सदर व्यक्तीने 4 वर्षांपूर्वी एका परित्यक्त्या महिलेशी दुसरे लग्न केली. पती देवदर्शनाला गेल्यानंतर साधली संधी या महिला आपल्या सवतीच्या दोन्ही मुलांसोबत सुखाने संसार करत होती. पण कालांतराने तिचे आपल्या सावत्र मुलाशी प्रेमसंबंध जुळले. एकाच घरात राहून त्यांचे संबंध सुरू होते. त्याची कुणकुण गावकऱ्यांनाही लागली होती. सदर महिलेचा पती गत 12 तारखेला देवदर्शनासाठी मुंबईला गेला. त्यावेळी ही संधी साधून सदर 40 वर्षीय महिला आपल्या सावत्र मुलासोबत पसार झाली. देवदर्शनाहून परतल्यानंतर सदर व्यक्तीला आपली पत्नी व मुलगा पसार झाल्याची गोष्ट कळली. त्यामुळे त्याने तातडीने पोलिसांत धाव घेऊन तक्रार दाखल केली. या प्रकरणाचा तपास पोलिस उपनिरीक्षक बाबासाहेब बांगर करत आहेत. जावयाच्या दुचाकीवरून झाले पसार दुसरीकडे, महिला व मुलगा तेलंगणात गेल्याची माहिती आहे. कारण, ते ज्या दुचाकीवरून (एमएच 13 बी.यू. 1587) पसार झाले, ती दुचाकी त्या महिलेच्या जावयाची आहे. ही दुचाकी वाहतूक नियमांचा भंग केल्याप्रकरणी तेलंगणा पोलिसांनी पकडली. त्या दुचाकीला 1, 235 रुपयांचा दंड ठोकल्याचा मेसेज 16 एप्रिल रोजीस काळी 11.56 वा. जावयाच्या मोबाईलवर आला. त्यामुळे हे दोघेही तेलंगणात गेल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार, आता पोलिस या दोघांचा शोध घेत आहेत. दरम्यान, या घटनेमुळे संबंधित कुटुंबाला मोठा मानसिक धक्का बसला आहे. परळी कृउबाच्या उपसभापतीवर प्राणघातक हल्ला दुसरीकडे, परळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती तथा गोवर्धन गावचे माजी सरपंच संजय देशमुख यांच्यावर रविवारी रात्री प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे. संजय देशमुख हे गोवर्धन गावातून सिरसाळ्याकडे येत असताना 2 दुचाकींवरून आलेल्या 6 अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर हल्ला चढवा. त्यात देशमुख जबर जखमी झाले. त्यांना तातडीने स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे उपचार केल्यानंतर त्यांना सुट्टी देण्यात आली. पण हा हल्ला नेमका कुणी व का केला हे अद्याप स्पष्ट झाले नाही. परळी पोलिस या घटनेचा तपास करत आहेत.