महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या पडद्यामागे अनेक घडामोडी सुरू असताना, परभणीतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय जाधव यांच्या वक्तव्याने नव्या चर्चांना तोंड फुटले आहे. एका सार्वजनिक कार्यक्रमात बोलताना त्यांनी, मी आज तुमच्यासोबत आहे, पण उद्याचं काही सांगता येणार नाही, असे विधान केले. या एका वाक्यामुळे त्यांच्या भविष्यातील राजकीय वाटचालीबाबत मोठा संभ्रम निर्माण झाला आहे. परभणीतील एका खासगी रुग्णालयाच्या उद्घाटन सोहळ्यात त्यांनी हे वक्तव्य केले. यावेळी त्यांनी आपल्या पक्षनिष्ठेबद्दल बोलताना स्पष्ट केले की, ज्या पक्षाने मला घडवले, त्याच्याबद्दल माझ्या मनात आजही आदर आहे आणि पुढेही राहील. त्यांनी आपल्याला संधी देणाऱ्यांशी प्रतारणा करण्याची मानसिकता नसल्याचे सांगितले. मात्र, बदलत्या राजकीय परिस्थितीत भविष्यात काय होईल, याबद्दल ते ठामपणे काही सांगू शकत नसल्याचे त्यांनी नमूद केले. याच भाषणात त्यांनी सध्याच्या राजकारणातील बदलत्या मूल्यांवरही भाष्य केले. त्यांच्या मते, राजकारण आता समाजकारणापेक्षा आर्थिक निकषांवर अधिक चालू लागले आहे. मतदारांच्या अपेक्षांमध्येही बदल झाल्याचे त्यांनी सांगितले. आज मतदारांना कामांपेक्षा पैशांमध्ये अधिक रस दिसतो. मतदानाच्या वेळी काही लोक उघडपणे पैशांची अपेक्षा करतात, असा अनुभव त्यांनी मांडला. आपल्या विचारांना अधोरेखित करताना त्यांनी एक म्हणही सांगितली की, मन चंगा तो कटोरी में गंगा, नियत में खतरा तो झोली में पथरा. या म्हणीद्वारे त्यांनी परिस्थितीनुसार निर्णय घ्यावा लागतो, असा अप्रत्यक्ष संकेत दिला. आम्ही राजकारणात अनेक चढ-उतार पाहिले आहेत. योग्य वेळ आल्यावरच निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. जाधव कोणता निर्णय घेतात, याकडे लक्ष संजय जाधव हे परभणी जिल्ह्यातील उद्धव ठाकरे गटाचे मोठे नेते म्हणून ओळखले जातात. त्यामुळे त्यांच्या या वक्तव्याने कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. त्यांच्या बोलण्यातून अस्वस्थता जाणवत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. विशेषतः त्यांनी भविष्यातील भूमिकेबाबत स्पष्टता न दिल्याने तर्कवितर्कांना अधिक वाव मिळाला आहे. दरम्यान, जर संजय जाधव यांनी शिंदे गटाची वाट धरली, तर मराठवाड्यातील राजकीय समीकरणांवर त्याचा मोठा परिणाम होऊ शकतो. ठाकरे गटासाठी हा मोठा धक्का ठरू शकतो, असे मानले जात आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत जाधव कोणता निर्णय घेतात, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
ठाकरे गटच्या खासदाराच्या वक्तव्याने पुन्हा राजकीय खळबळ:उद्याचं सांगता येत नाही, सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण; शिंदे गटात जाणार?
-
By सुरेश पाचभाई
- May 2, 2026
📞 Phone: 9922862184
SP न्यूज मारेगांव हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजिटल स्वरूपातील ऑनलाईन
न्युज पोर्टल असून या माध्यमाद्वारे परिसरातील ताज्या घडामोडी व बातम्या,
सामाजिक व राजकीय, विश्लेषणात्मक बातम्या आणि महाराष्ट्र, देश, क्रीडा,
कृषी, मनोरंजन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या
त्वरित जनतेपर्यंत पोहचविण्याचा एकमेव उद्देश आहे.
“घडावा देश, हाच उद्देश… आवाज जनतेचा”
Show Comments (0)
Hide Comments (0)
0
0
votes
Article Rating
Subscribe
Login
0 Comments
Oldest
Newest
Most Voted
Inline Feedbacks
View all comments
Recent Posts:
हिंगोली जिल्ह्याचा बारावीचा निकाल ८२.८६%:यंदा निकालाची टक्केवारी...
1views
0likes
-
By सुरेश पाचभाई
- May 2, 2026
पुणे जिल्ह्यातील घटना अत्यंत निंदनीय:प्रकरण फास्टट्रॅक कोर्टात...
1views
0likes
-
By सुरेश पाचभाई
- May 2, 2026
व्हायरल होण्याचा नादखुळा:रील्समुळे तरुणाईची हरवली ‘रिअल लाईफ’,...
0views
0likes
-
By सुरेश पाचभाई
- May 2, 2026
