Shopping Cart
Total:

$0.00

Items:

0

Your cart is empty
Keep Shopping

मुंबईत जवळपास 50 टक्के नालेसफाईचे काम पूर्ण:31 मेपर्यंत काम पूर्ण करण्याचे बीएमसीला निर्देश– आमदार अमित साटम

पावसाळ्यातील पूरस्थितीमुळे मुंबईकरांना होणारा त्रास कमी करण्यासाठी मुंबई भाजप अध्यक्ष आमदार अमित साटम यांनी सांगितले की, मुंबईतील जवळपास 50 टक्के नालेसफाईचे काम पूर्ण झाले असून उर्वरित काम 31 मेपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश बीएमसीला देण्यात आले आहेत.

आमदार साटम यांनी पश्चिम उपनगरांतील बांद्रा, जुहू, अंधेरी (पश्चिम), वर्सोवा आणि गोरेगाव येथील नाला सफाई कामांची पाहणी केली. यावेळी मुंबई उपनगरचे सहपालकमंत्री मंगल प्रभात लोढा, महापालिकेचे सभागृह नेते गणेश खनकर, अतिरिक्त महापालिका आयुक्त अविनाश ढाकणे, पर्जन्य जलवाहिनी विभागाचे अधिकारी, महापालिका उपायुक्त, स्थानिक वॉर्ड अधिकारी आणि नगरसेवक उपस्थित होते.

मुंबईकरांचा त्रास कमी करणार अमित साटम म्हणाले की, मुंबईकरांना आगामी पावसाळ्यात कमीत कमी त्रास व्हावा आणि 31 मेपर्यंत 100% नाला सफाईचे काम पूर्ण व्हावे, या उद्देशाने ही पाहणी दौऱ्याचे आयोजन करण्यात आले होते. सध्या सुमारे 40–50% नालेसफाईचे काम पूर्ण झाले असून उर्वरित काम या महिन्याच्या अखेरीस पूर्ण करण्याचे निर्देश प्रशासनाला देण्यात आले आहेत, असे आमदार अमित साटम यांनी सांगितले.

कचरा समुद्रात जाण्यापासून रोखणार अमित साटम म्हणाले की, पाहणीदरम्यान ज्या ठिकाणी नद्या आणि नाले समुद्राला मिळतात, त्या सर्व ठिकाणी कचरा समुद्रात जाण्यापासून रोखण्यासाठी ट्रॅश बूम बसवण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. महापालिका प्रशासनावर देखरेख ठेवण्यासाठी आणि कामे वेळेत पूर्ण व्हावीत यासाठी पालकमंत्री, महापौर, उपमहापौर, सभागृह नेते आणि आमदार वेगवेगळ्या वेळी विविध ठिकाणी पाहणी करत असल्याचेही साटम यांनी सांगितले.

Read Also:
0
Show Comments (0) Hide Comments (0)
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest
0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
Recent Posts:
error: Content is protected !!