नैऋत्य मान्सून दोन आठवड्यांनंतर आता पुढे सरकू शकतो. बंगालच्या उपसागरात एक हवामान प्रणाली तयार झाली आहे, जी मान्सूनला महाराष्ट्रात पुढील वाटचालीस अनुकूल ठरेल. याचा वेग चांगला राहिला तर येत्या २ ते ३ दिवसात मुंबईत मान्सूनचा पाऊस पडू शकेल. दरम्यान, पावसाच्या नोंदीच्या १२६ वर्षांच्या इतिहासातील हा दुसरा सर्वात कोरडा जून महिना संपत आहे. यापूर्वी २००९ मध्ये संपूर्ण जूनमध्ये सरासरीपेक्षा ४९% कमी पावसाची नोंद झाली होती. २१ जूनपर्यंत देशात सरासरी ९९.२ मिमी पाऊस व्हायला हवा होता, पण ५७.४ मिमी पाऊस झाला आहे. म्हणजेच ४२.२% तूट आहे. दुसरीकडे, मुंबई, पुण्यात रविवारी पूर्वमोसमी रिमझिम पाऊस झाला. कमकुवत मान्सूनमुळे पेरणी क्षेत्र घटले पेरणी प्रभावित : १२ जूनपर्यंत एकूण खरीप पेरणी वार्षिक आधारावर ३.९% घटून ८४.६ लाख हेक्टर राहिली.
पिकांवर परिणाम : डाळींचे क्षेत्र ४३.२% आणि कापसाचे २८% घटले. मात्र, भात पेरणीत २८.४% वाढ नोंदवली गेली. दिलासा : जलाशयांची पाणीपातळी क्षमतेच्या २८.३% आहे. (सिंचनासाठी बफर).
आशा : देशात ढग दाटताहेत
