ब्रेकिंग न्यूज
पिसगाव येथे मिस्त्री कामगाराची गळफास घेऊन आत्महत्या Dhiraj Pardeshi Case Update | धीरज परदेशी प्रकरणी पोलिसांची कारवाई | Ahilyanagar Crime News पावसाळ्यात जनावराच्या तोंडाला अन् जिभेवर फोड, असू शकतो गंभीर आजराचा धोका, अशी घ्या काळजी वाह रे मित्र…! घरी आला, खाल्लं, पिलं अन् जाता जाता…, कोल्हापूर पोलिसांनी 24 तासांत उचललं महाआवास अभियानात प्रतीक्षा गाडगे यांची दमदार कामगिरी Shravan Astrology: श्रावणात ग्रह फिरले, कुणाला संधी तर कुणावर संकट. मेष ते मीन राशीवाले काय काळजी घ्याल? खर्च कमी अन् मिळेल भरघोस उत्पन्न, गट शेती ठरेल फायद्याची, कृषी तज्ज्ञांनी दिला महत्त्वाचा सल्ला, Video Agniveer-Bharti-2026: भावांनो, लागा तयारीला…! कोल्हापुरात 14 सप्टेंबरपासून अग्निवीर भरती, कुणाला संधी? CRIME : रात्री बायकोसोबत ‘आखाड पार्टी’ केली अन् सकाळी शुद्धीत येताच डोक्यात कुकरचं झाकण घालून संपवलं! शिक्ष… Maratha OBC Reservation: मराठा आरक्षणाचा वाद पुन्हा पेटणार? जरांगेंच्या आक्रमकतेला उत्तर देण्यासाठी OBC सम…
SP News Maregaon

शेतकऱ्यांचे तीन दिवसांपासून नाल्यात ठिय्या आंदोलन:कंजारा येथे नाला सरळीकरण करण्याची मागणी, पावसामुळे होतेय ३०० एकर क्षेत्राचे नुकसान

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


औंढा नागनाथ तालुक्यातील कंजारा येथील नाल्याचे खोलीकरण करून सरळीकरण करावे या मागणीसाठी शेतकऱ्यांनी मागील तीन दिवसांपासून नाल्यातच ठिय्या आंदोलन सुरु केले आहे. मृद व जलसंधारण विभागाने या आंदोलनाकडे दुर्लक्ष केल्याने शेतकऱ्यांतून तिव्र संताप व्यक्त केला जात आहे. औंढा नागनाथ तालुक्यातील पिंपळदरी व कंजारा माळरानावरून मोठ्या नाल्याचा उगम आहे. या नाल्याचे पाणी कंजारा शिवारातून पुढे कयाधू नदीमध्ये जाते. सदरील नाला उथळ व अरुंद असल्याने दरवर्षी थोड्या पावसातही माळरानावरील पाणी नाल्यात येते. मात्र अरुंद नाल्यामुळे पाणी थेट शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन मोठे नुकसान होते. मागील काही वर्षापासून परिसरातील सुमारे ६० ते ७० शेतकऱ्यांचे ३०० एकर क्षेत्राचे नुकसान होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना खरीपाच्या पिकावर पाणी सोडावे लागत आहे. दरम्यान, या नाल्याचे रुंदीकरण व खोलीकरण करण्याचा ठराव ग्रामपंचायत कार्यालयाने सन २०२२ मध्ये मृद व जलसंधारण विभागाकडे दिला होता. मात्र या ठरावाकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्यानंतर शेतकऱ्यांनी आॅक्टोबर २०२५ मध्ये विभागाला निवेदन दिले होते. त्यानंतर या विभागाने तीन किलो मिटर अंतराच्या नाल्याचे रुंदीकरण व खोलीकरण करण्याचे अंदाजपत्रक तयार केले. मात्र या अंदाजपत्रकाला मान्यताच मिळाली नाही. या प्रकारामुळे संतप्त शेतकरी प्रविण कल्याणकर, डिगांबर कल्याणकर, गणेश कल्याणकर, दत्तराव कल्याणकर, मंचक कल्याणकर, रामेश्‍वर कल्याणकर, कृष्णा कल्याणकर, मनोज कल्याणकर, सुधाकर कल्याणकर, शेषराव कल्याणकर, संतोष कल्याणकर यांनी ता. १५ मे पासून नाल्यामध्येच ठिया आंदोलन सुरु केले आहे. मागील तीन दिवसांपासून आंदोलन सुरु असतांनाही प्रशासनाचा एकही अधिकारी आंदोलकांशी चर्चा करण्यासाठी गेला नाही. या प्रकारामुळे शेतकऱ्यांतून तिव्र संताप व्यक्त होत असून मागणी मान्य झाल्या शिवाय आंदोलन मागे घेणार नसल्याची भुमीका शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. मृद व जलसंधारणाची चुक शेतकऱ्यांच्या माथी – प्रविण कल्याणकर, शेतकरी या संदर्भात शेतकऱ्यांनी मृद व जलसंधारण विभागाशी संपर्क साधला होता. मात्र नाल्याच्या कामाचे अंदाजपत्रक मार्च पुर्वी झाले असते तर जिल्हा नियोजनमधून निधी देता आला असता असे सांगण्यात आले. मात्र अंदाजपत्रक तयार करण्याचे काम मृद व जलसंधारण विभागाचे आहे. मात्र त्यांच्याकडून चूक मान्य केली जात नाही.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर