प्रमुख रस्त्यांवर खड्डे कायम,‎ रस्ते पॅचिंगकडे मनपाचे दुर्लक्ष‎:आंदोलनाच्या इशाऱ्याचा नगरसेवकांना विसर‎

प्रतिनिधी | अहिल्यानगर मध्य शहर व उपनगरातील अनेक प्रमुख रस्त्यांवर, अंतर्गत रस्त्यांवर अद्यापही खड्डे कायम आहेत. पावसाळा १५ दिवसांवर येऊन ठेपला आहे. तरीही महापालिकेने खड्डे बुजविण्यास सुरुवात केलेली नाही. सावेडी उपनगरातील भाजप नगरसेवकांनी दहा दिवसांपूर्वी महापालिकेला निवेदन देऊन आंदोलनाचा इशारा दिला होता. या इशाऱ्याचा नगरसेवकांना विसर पडला आहे. परिणामी, नागरिकांना अद्यापही खड्ड्यांचे दणके सोसावे लागत आहेत. मध्य शहरातील सर्जेपुरा ते भिंगारवाला चौक रस्त्याचे काम ठप्प आहे. त्यामुळे बाजारपेठेकडे जाणाऱ्या या प्रमुख रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. दिल्लीगेट ते जुनी महापालिका रस्त्यावरही खड्डे आहेत. सावेडी उपनगरातील टीव्ही सेंटर उर्वरित पान ४ पॅचिंगसाठी एक कोटींची तरतूद केवळ कागदावरच महापालिकेने शहरातील प्रत्येकी दोन प्रभाग समित्यांसाठी एक यानुसार प्रत्येकी ५० लाख रुपयांच्या दोन निविदा मंजूर आहेत. या सुमारे एक कोटींच्या निविदेपैकी सुमारे ३० लाख रुपये खर्च झाला आहे. उर्वरित तरतूद शिल्लक आहे. मात्र, या तरतुदी केवळ कागदावरच असून प्रत्यक्ष तिजोरीत मात्र खडखडाटच आहे. त्यामुळे खड्डे बुजविण्यासाठी ठेकेदारांकडूनही टाळाटाळ केली जात आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!