ब्रेकिंग न्यूज
श्रावणात श्री क्षेत्र पांडवदेवीत भक्तांची अलोट गर्दी भाजपा मारेगाव शहर सरचिटणीसपदी रविंद्र टोंगे पैशांचा पाऊस पाडण्यासाठी अघोरी पूजा; 15 वर्षीय मुलीसोबत घडणार होतं नको तेच, 15 जणांविरुद्ध गुन्हा पहाटे घराबाहेर पडताच तो मागे लागला; कॉलेजच्या वाटेत अडवलं अन् मुंबईत घडला भयंकर प्रकार IND vs SL Test : बॉलिंगने आग ओकणाऱ्या DSP सिराजचा बॅटिंगमध्ये जलवा; गगनचुंबी सिक्स पाहून श्रीलंका आवाक्, पा… पिसगाव येथे मिस्त्री कामगाराची गळफास घेऊन आत्महत्या Dhiraj Pardeshi Case Update | धीरज परदेशी प्रकरणी पोलिसांची कारवाई | Ahilyanagar Crime News पावसाळ्यात जनावराच्या तोंडाला अन् जिभेवर फोड, असू शकतो गंभीर आजराचा धोका, अशी घ्या काळजी वाह रे मित्र…! घरी आला, खाल्लं, पिलं अन् जाता जाता…, कोल्हापूर पोलिसांनी 24 तासांत उचललं महाआवास अभियानात प्रतीक्षा गाडगे यांची दमदार कामगिरी
SP News Maregaon

रेल्वेच्या कारवाईपूर्वी नागरिकांचे पुनर्वसन करा:आ. साजिद खान पठाण यांची मागणी

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


शहरातील प्रभाग क्रमांक ७ मधील तारफैल परिसरात गेल्या तीन पिढ्यांपासून वास्तव्यास असलेल्या कुटुंबांवर बेघर होण्याची टांगती तलवार आहे. रेल्वे विभागाकडून संबंधित जागा ताब्यात घेण्याच्या हालचालींना वेग आल्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस आमदार साजिद खान पठाण यांनी उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयात बैठक घेत प्रशासनाकडे प्रभावित कुटुंबीयांच्या पुनर्वसनाची मागणी केली. तारफैल परिसरातील काही भाग रेल्वे विभागाच्या अखत्यारीत येत असून त्या ठिकाणी अनेक कुटुंबे दशकांपासून राहत आहेत. रेल्वे प्रशासनाकडून जागा ताब्यात घेण्याच्या हालचाली सुरू झाल्यानंतर परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर भूमी अभिलेख विभागामार्फत जागेची मोजणीही करण्यात आली आहे.दरम्यान मंगळवारी भूमी अभिलेख कार्यालयात बैठक झाली. आ. पठाण यांनी मोजणी शिट, सीमांकन व अन्य तांत्रिक बाबींचा सविस्तर आढावा घेतला. जागा ताब्यात घेण्यापूर्वी शासनाने प्रभावित कुटुंबियांचे पुनर्वसन करणे अत्यावश्यक आहे. कोणत्याही परिस्थितीत नागरिकांना अचानक बेघर करू नये, अशी भूमिका त्यांनी मांडली. जर तातडीने तोडगा निघत नसेल, तर कुटुंबियांना पर्यायी व्यवस्था करण्यासाठी काही कालावधी देण्यात यावा, अशीही मागणी त्यांनी केली. यापूर्वीही या प्रश्नावर जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक पार पडली होती. तसेच पालकमंत्री आकाश फुंडकर आणि जिल्हाधिकारी वर्षा मीना यांच्याशी चर्चा करून पुनर्वसनाचा मुद्दा मांडण्यात आला होता. यावेळी कोणावरही अन्याय होणार नाही, अशी ग्वाही पालकमंत्र्यांनी दिल्याची माहिती आ. पठाण यांनी दिली.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर