ब्रेकिंग न्यूज
श्रावणात श्री क्षेत्र पांडवदेवीत भक्तांची अलोट गर्दी भाजपा मारेगाव शहर सरचिटणीसपदी रविंद्र टोंगे पैशांचा पाऊस पाडण्यासाठी अघोरी पूजा; 15 वर्षीय मुलीसोबत घडणार होतं नको तेच, 15 जणांविरुद्ध गुन्हा पहाटे घराबाहेर पडताच तो मागे लागला; कॉलेजच्या वाटेत अडवलं अन् मुंबईत घडला भयंकर प्रकार IND vs SL Test : बॉलिंगने आग ओकणाऱ्या DSP सिराजचा बॅटिंगमध्ये जलवा; गगनचुंबी सिक्स पाहून श्रीलंका आवाक्, पा… पिसगाव येथे मिस्त्री कामगाराची गळफास घेऊन आत्महत्या Dhiraj Pardeshi Case Update | धीरज परदेशी प्रकरणी पोलिसांची कारवाई | Ahilyanagar Crime News पावसाळ्यात जनावराच्या तोंडाला अन् जिभेवर फोड, असू शकतो गंभीर आजराचा धोका, अशी घ्या काळजी वाह रे मित्र…! घरी आला, खाल्लं, पिलं अन् जाता जाता…, कोल्हापूर पोलिसांनी 24 तासांत उचललं महाआवास अभियानात प्रतीक्षा गाडगे यांची दमदार कामगिरी
SP News Maregaon

112 ठरतोय ‘लाइफलाइन’; वर्षभरात 45 हजार कॉल:मदतीसाठी पोलिसांची अवघ्या 9 मिनिटांत एन्ट्री: महिला सुरक्षा आणि क्राईमच्या तक्रारीत सर्वाधिक वाढ‎

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


राज्यातील कायदा व सुव्यवस्था अधिक मजबूत करण्यासाठी आणि नागरिकांना तातडीने मदत पोहोचवण्यासाठी गृह विभागाने सुरू केलेली ‘११२’ ही आपत्कालीन सेवा आता खऱ्या अर्थाने जीवनवाहिनी ठरत आहे. गेल्या एका वर्षात सोलापूर ग्रामीण पोलिसांच्या या हेल्पलाईनवर तब्बल ४५,४०० फोन आले असून, त्यामध्ये महिला सुरक्षा आणि गुन्हेगारी संदर्भातील तक्रारींचे प्रमाण सर्वाधिक असल्याचे दिसून आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एकूण ४५,४०० कॉल्सपैकी मोठा हिस्सा हा महिलांवरील अत्याचार, घरगुती हिंसाचार आणि छेडछाडीच्या तक्रारींचा होता. महिलांच्या सुरक्षेसाठी ही सेवा अत्यंत प्रभावी ठरत असून, संकटसमयी साद घातल्यास पोलीस अवघ्या काही मिनिटांत घटनास्थळी दाखल होत आहेत. महिलांच्या बरोबरीनेच चोरी, हाणामारी आणि इतर गंभीर गुन्ह्यांची माहिती देण्यासाठी नागरिकांनी या क्रमांकाचा मोठ्या प्रमाणावर वापर केला आहे. नागरिकांनी खोटे अथवा विनाकारण कॉल करून सेवेचा गैरवापर करू नये ^जिल्ह्यातील नागरिकांनी कोणतीही आपत्कालीन घटना, अपघात, महिलांवरील अत्याचार, मारामारी अथवा संशयास्पद हालचाल आढळल्यास तात्काळ ‘डायल ११२’ वर संपर्क साधावा. ही सेवा २४×७ कार्यरत असून सोलापूर ग्रामीण पोलीस सदैव तत्पर आहे. नागरिकांनी खोटे अथवा विनाकारण कॉल करून सेवेचा गैरवापर करू नये. – अतुल कुलकर्णी, पोलिस अधीक्षक, सोलापूर. ९ मिनिटांत मिळतो मदतीचा हात आधुनिक तंत्रज्ञानामुळे शहरी भागात पोलिसांचा प्रतिसाद वेळ (रिस्पॉन्स टाइम) आता ७ ते ९ मिनिटांपर्यंत खाली आला आहे. प्रत्येक पोलीस गाडीमध्ये जीपीएस यंत्रणा असल्याने, नियंत्रण कक्षाला सर्वात जवळ असलेले वाहन घटनास्थळी त्वरित पाठवणे शक्य झाले आहे. ग्रामीण भागातही १० मिनिटांत मदत पोहोचवली जात आहे. ही सेवा २४×७ कार्यरत असून सोलापूर ग्रामीण पोलीस सदैव तत्पर आहे. नागरिकांनी खोटे अथवा विनाकारण कॉल करून सेवेचा गैरवापर करू नये. विशेष म्हणजे, फोन कट झाला तरी पोलीस स्वतः ‘कॉल बॅक’ करून परिस्थितीची खातरजमा करतात.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर