Skip to content
ब्रेकिंग न्यूज:
वाढदिवसानिमित्त सामाजिक बांधिलकीचा संदेश | पुणे विद्यापीठात दहशतवाद विरोधी दिन पाळला:राजीव गांधींच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन, हिंसाचार विरोधी प्रतिज्ञा घेतली | महापालिका अधिकाऱ्याला जातीवाचक शिवीगाळ, ९ जणांवर गुन्हा:खंडणी मागितल्याचा आरोप; अ‍ॅट्रोसिटी कायद्यान्वये कारवाई | पुणे महापालिका: 5 दिवसांत 10 टक्के घरांची नोंदणी पूर्ण:राष्ट्रीय जनगणना मोहिमेचा दुसरा टप्पा, 15 जूनपर्यंत प्रक्रिया पूर्ण होणार | दगडूशेठ ट्रस्टतर्फे मोफत महाआरोग्य शिबीर:23 मे रोजी नू.म.वि. प्रशालेत, जय गणेश रुग्णसेवा अभियानांतर्गत आयोजन
SP News Maregaon
पुणे विद्यापीठात दहशतवाद विरोधी दिन पाळला:राजीव गांधींच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन, हिंसाचार विरोधी प्रतिज्ञा घेतली

पुणे विद्यापीठात दहशतवाद विरोधी दिन पाळला:राजीव गांधींच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन, हिंसाचार विरोधी प्रतिज्ञा घेतली

6 hours पूर्वी · 1 min read

auto_awesomeथोडक्यात महत्त्वाचे

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात (SPPU) माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त 'दहशतवाद आणि हिंसाचार विरोधी दिन' पाळण्यात आला. या प्रसंगी राजीव गांधी यांना आदरांजली वाहण्यात आली आणि दहशतवाद व हिंसाचार...

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात (SPPU) माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त ‘दहशतवाद आणि हिंसाचार विरोधी दिन’ पाळण्यात आला. या प्रसंगी राजीव गांधी यांना आदरांजली वाहण्यात आली आणि दहशतवाद व हिंसाचार विरोधी प्रतिज्ञा घेण्यात आली. विद्यापीठाच्या सरस्वती सभागृहात आयोजित या कार्यक्रमात कुलगुरू प्रा. (डॉ.) सुरेश गोसावी, प्र-कुलगुरू प्रा. डॉ. पराग काळकर, व्यवस्थापन परिषद सदस्य रवींद्र शिंगणापूरकर, अधिष्ठाता डॉ. प्रभाकर देसाई, डॉ. सदानंद बनसोडे, डॉ. मंडलिक, वित्त व लेखा अधिकारी सीएमए डॉ. चारूशिला गायके, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. तलवारे आणि संचालक व विभागप्रमुख डॉ. विलास आढाव यांनी राजीव गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. सहायक कुलसचिव डॉ. अजय ठुबे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. या प्रसंगी विविध शैक्षणिक व प्रशासकीय विभागांचे विभागप्रमुख, संघटनांचे पदाधिकारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. पुणे जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनेही माजी पंतप्रधान राजीव गांधी यांना आदरांजली दरम्यान, पुणे जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनेही माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना आदरांजली वाहण्यात आली. पुणे जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्रीरंगनाना चव्हाण पाटील यांच्या हस्ते राजीव गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. या कार्यक्रमाला काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी बोलताना श्रीरंगनाना चव्हाण पाटील यांनी राजीव गांधींच्या कार्याचे कौतुक केले. ते म्हणाले की, “देशाच्या प्रगतीसाठी आधुनिक तंत्रज्ञान, संगणकीकरण आणि युवकांना राजकारणात संधी देण्याचे मोठे काम राजीव गांधी यांनी केले. त्यांनी भारताला २१व्या शतकाकडे नेण्याचे स्वप्न पाहिले आणि त्या दिशेने अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले.” चव्हाण पाटील पुढे म्हणाले, “पंचायतराज व्यवस्था मजबूत करून ग्रामीण भागातील लोकशाही अधिक सक्षम करण्यासाठी राजीव गांधींनी प्रयत्न केले. दूरसंचार क्रांती, माहिती तंत्रज्ञान आणि शिक्षण क्षेत्रात त्यांनी घेतलेल्या निर्णयांचा देशाला मोठा फायदा झाला. त्यांच्या दूरदृष्टीमुळेच आज भारत जागतिक स्तरावर तंत्रज्ञान क्षेत्रात सक्षमपणे उभा आहे.”

तुमची प्रतिक्रिया:
error: Content is protected !!