तालुक्यातील वटवटे येथील जकराया साखर कारखान्याने सन २०२५ – २६ च्या चालु गळीत हंगामात जाहीर केलेल्या ऊसदरा पैकी ५० टक्केच रक्कम शेतकऱ्यांना दिलेली आहे. उर्वरित ५० टक्के रक्कम दिलेली नाही. ती रक्कम तात्काळ १५ टक्के व्याजासह शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावी या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य जनहित शेतकरी संघटनेच्या वतीने संस्थापक प्रभाकर देशमुख यांनी बेमुदत धरणे आंदोलनास शुक्रवारपासून सुरुवात केली आहे. मोहोळ तालुक्यातील जकराया साखर कारखान्याने सन २०२५ – २६ च्या गाळप हंगामात गाळप गेलेल्या शेतकऱ्यांच्या उसाचे थकीत बिल १५०० रुपयां प्रमाणे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली होते.मात्र उर्वरित ५० टक्के थकीत बिल प्रति टन नियमा प्रमाणे ३ हजार रुपये १५ टक्के व्याजासह शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करणे बंधनकारक असताना कारखाना प्रशासनाने शेतकऱ्यांच्या बिलाची संदर्भात गांभीर्याने दखल घेतली नसल्याने शेतकऱ्यांची मोठी आर्थिक अडचण निर्माण झाली आहे.या संदर्भात तात्काळ प्रशासनाने संबंधित कारखान्याला पत्रव्यवहार करून राहिलेले शेतकऱ्यांचे पैसे देण्यासाठी भाग पाडावे अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा ही प्रभाकर देशमुख यांनी यावेळी दिला आहे . यावेळी बिरू वाघमोडे, पिंटू पवार, दिगंबर कावळे, गणेश चवरे, बालाजी कदम, राजाभाऊ पवार आदी उपस्थित होते.