ब्रेकिंग न्यूज
श्रावणात श्री क्षेत्र पांडवदेवीत भक्तांची अलोट गर्दी भाजपा मारेगाव शहर सरचिटणीसपदी रविंद्र टोंगे पैशांचा पाऊस पाडण्यासाठी अघोरी पूजा; 15 वर्षीय मुलीसोबत घडणार होतं नको तेच, 15 जणांविरुद्ध गुन्हा पहाटे घराबाहेर पडताच तो मागे लागला; कॉलेजच्या वाटेत अडवलं अन् मुंबईत घडला भयंकर प्रकार IND vs SL Test : बॉलिंगने आग ओकणाऱ्या DSP सिराजचा बॅटिंगमध्ये जलवा; गगनचुंबी सिक्स पाहून श्रीलंका आवाक्, पा… पिसगाव येथे मिस्त्री कामगाराची गळफास घेऊन आत्महत्या Dhiraj Pardeshi Case Update | धीरज परदेशी प्रकरणी पोलिसांची कारवाई | Ahilyanagar Crime News पावसाळ्यात जनावराच्या तोंडाला अन् जिभेवर फोड, असू शकतो गंभीर आजराचा धोका, अशी घ्या काळजी वाह रे मित्र…! घरी आला, खाल्लं, पिलं अन् जाता जाता…, कोल्हापूर पोलिसांनी 24 तासांत उचललं महाआवास अभियानात प्रतीक्षा गाडगे यांची दमदार कामगिरी
SP News Maregaon

पॉस मशीनवरून एप्रिलचा डेटा गायब:तीन महिन्यांच्या धान्य वाटपात तांत्रिक अडचणी, अचलपुरातील नागरिक त्रस्त

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


राज्य शासनाने एप्रिल, मे आणि जून या तीन महिन्यांचे धान्य एकाच वेळी वितरित करण्याचे नियोजन केले होते. मात्र, अचलपूर तालुक्यात राशनधारकांना केवळ दोन महिन्यांचाच धान्यसाठा मिळत आहे. यामुळे राशनधारक आणि स्वस्त धान्य दुकानदार यांच्यात संभ्रम आणि नाराजी निर्माण झाली आहे. रेशन दुकानदार आणि काही ग्राहकांनी दिलेल्या माहितीनुसार, स्वस्त धान्य दुकानांच्या पॉस मशीनवरील एप्रिल महिन्याचा डेटा नष्ट झाल्याने धान्य वितरणात अडचण येत आहे. धान्य पोहोचण्यापूर्वीच पॉस मशीनवरील डेटा डिलीट झाल्यामुळे तांत्रिक समस्या वाढल्या आहेत. गहू, तांदूळ आणि मका यांचा पुरेसा साठा उपलब्ध नसल्याने प्रत्यक्ष वितरण केवळ दोन महिन्यांचेच होत आहे. केंद्र सरकारच्या प्रणालीमधून एप्रिल महिन्याचा डेटा डिलीट झाल्याचे सांगितले जात असून, राज्य शासनाने तो पुन्हा उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात येत आहे. या तांत्रिक त्रुटीचा थेट फटका राशनधारकांना बसत आहे. अचलपूर तालुक्यात एकूण १६६ स्वस्त धान्य दुकाने असून, शहर परिसरात ४४ दुकानदार कार्यरत आहेत. सध्या सुमारे ७० टक्के राशनधारकांना पूर्ण धान्य मिळालेले नाही. तालुक्यासाठी अंदाजे ११ हजार ५०० क्विंटल गहू, तांदूळ आणि मक्याची आवश्यकता असताना, केवळ ८ हजार क्विंटल धान्यसाठा उपलब्ध करून देण्यात आला आहे. तीन महिन्यांसाठी आवश्यक असलेला ३६ हजार क्विंटल धान्यसाठा अद्याप २२ हजार क्विंटलपर्यंतच पोहोचला आहे. पॉस मशीनवरील तांत्रिक अडचणी आणि धान्य वेळेवर न पोहोचल्याने राशनधारक व स्वस्त धान्य दुकानदारांना नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. शासनाने तातडीने ही समस्या सोडवावी, तसेच धान्य वितरणात दिरंगाई करणाऱ्या यंत्रणेची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर