ब्रेकिंग न्यूज
श्रावणात श्री क्षेत्र पांडवदेवीत भक्तांची अलोट गर्दी भाजपा मारेगाव शहर सरचिटणीसपदी रविंद्र टोंगे पैशांचा पाऊस पाडण्यासाठी अघोरी पूजा; 15 वर्षीय मुलीसोबत घडणार होतं नको तेच, 15 जणांविरुद्ध गुन्हा पहाटे घराबाहेर पडताच तो मागे लागला; कॉलेजच्या वाटेत अडवलं अन् मुंबईत घडला भयंकर प्रकार IND vs SL Test : बॉलिंगने आग ओकणाऱ्या DSP सिराजचा बॅटिंगमध्ये जलवा; गगनचुंबी सिक्स पाहून श्रीलंका आवाक्, पा… पिसगाव येथे मिस्त्री कामगाराची गळफास घेऊन आत्महत्या Dhiraj Pardeshi Case Update | धीरज परदेशी प्रकरणी पोलिसांची कारवाई | Ahilyanagar Crime News पावसाळ्यात जनावराच्या तोंडाला अन् जिभेवर फोड, असू शकतो गंभीर आजराचा धोका, अशी घ्या काळजी वाह रे मित्र…! घरी आला, खाल्लं, पिलं अन् जाता जाता…, कोल्हापूर पोलिसांनी 24 तासांत उचललं महाआवास अभियानात प्रतीक्षा गाडगे यांची दमदार कामगिरी
SP News Maregaon

मनाच्या चंचलतेवर भक्ती, सत्संग हाच उपाय- राजेशकृष्ण महाराज:सुंदरकांड पठणासह होणार सुदामा चरित्राचे सादरीकरण‎

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


मानवी मन अत्यंत सूक्ष्म आणि चंचल आहे. या चंचलतेमुळे माणसाचे पतन होते आणि अपेक्षित ध्येय साध्य करता येत नाही. सदा भरकटणाऱ्या मनामुळे व्यक्तीचा सर्वंकष विकास खुंटतो. त्यामुळे मनाच्या या चंचलतेवर नियंत्रण मिळवण्यासाठी भगवंताची भक्ती आणि सत्संग हाच एकमेव प्रभावी उपाय आहे. मनात भक्तीची ज्योत सतत तेवत ठेवून चंचलतेचा त्याग करावा, असा अमूल्य उपदेश वृंदावन येथील आंतरराष्ट्रीय भागवत कथाकार राजेशकृष्ण महाराज यांनी केला. माहेश्वरी महिला मंडळाच्या वतीने पुरुषोत्तम मासानिमित्त माहेश्वरी भवनात श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञाचे आयोजन करण्यात आले आहे. या ज्ञानयज्ञाचे चौथे पुष्प गुंफताना राजेशकृष्ण महाराज बोलत होते. ते पुढे म्हणाले की, केवळ स्थिर मनातच खऱ्या भक्तीची आस निर्माण होऊ शकते. भूतकाळात अनेक संतांनी आपल्या चंचल मनावर विजय मिळवून भक्तीची ज्योत प्रज्वलित केली आणि भगवंताला प्रसन्न करून घेतले. कथेचे मुख्य यजमान उमेश टावरी, मीना टावरी, किशोर लाहोटी, कृष्णा लाहोटी आणि पोथी यजमान हेमा खटोड यांच्यासह माहेश्वरी महिला मंडळाच्या अनेक पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत महाआरती करण्यात आली. धार्मिक कार्यक्रमांचा लाभ घेण्याचे आवाहन माहेश्वरी महिला मंडळाच्या अध्यक्षा वंदना हेडा, सचिव शोभा बियाणी व समस्त कार्यकारिणीने केले आहे. कृष्णजन्माचा सोहळा अन् मनमोहक देखावा या विशेष सत्रात महाराजांनी वामन अवतार आणि भगवान श्रीकृष्णाच्या जन्माची कथा भाषेत मांडली. आसुरी शक्तींचा नायनाट करण्यासाठीच भगवान श्रीकृष्णांनी भूतलावर अवतार घेतला, असे त्यांनी सांगितले. कृष्णजन्माच्या प्रसंगी कथास्थळी भगवान श्रीकृष्णाची अत्यंत सुंदर आणि मनमोहक देखावा साकारण्यात आला होता. देवकी आणि वासुदेव यांच्यासह बालकृष्णाची देखावा पाहण्यासाठी महिला भाविकांनी कथास्थळी गर्दी केली होती. देखाव्यात नंद, यशोदा, बालकृष्णाचे साकारले रूप उत्सवासाठी कथा मंडप रंगीबेरंगी फुगे आणि फुलांनी सजवण्यात आला होता. महिला भाविकांनी “नंद के आनंद भयो, जय कन्हैया लाल की’ चा जयघोष करत, सामूहिक नृत्य सादर करत जल्लोष केला. या प्रसंगी भाविकांना प्रसाद वितरित करण्यात आला. या जिवंत देखाव्यात वामन म्हणून प्रद्युम्न जाजू, यशोदा म्हणून मीना टावरी, नंदबाबा म्हणून उमेश टावरी, बालकृष्ण म्हणून श्रीनय हेडा, किशोर लाहोटी यांनी वासुदेवाची भूमिका साकारली.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर