ब्रेकिंग न्यूज
पिसगाव येथे मिस्त्री कामगाराची गळफास घेऊन आत्महत्या Dhiraj Pardeshi Case Update | धीरज परदेशी प्रकरणी पोलिसांची कारवाई | Ahilyanagar Crime News पावसाळ्यात जनावराच्या तोंडाला अन् जिभेवर फोड, असू शकतो गंभीर आजराचा धोका, अशी घ्या काळजी वाह रे मित्र…! घरी आला, खाल्लं, पिलं अन् जाता जाता…, कोल्हापूर पोलिसांनी 24 तासांत उचललं महाआवास अभियानात प्रतीक्षा गाडगे यांची दमदार कामगिरी Shravan Astrology: श्रावणात ग्रह फिरले, कुणाला संधी तर कुणावर संकट. मेष ते मीन राशीवाले काय काळजी घ्याल? खर्च कमी अन् मिळेल भरघोस उत्पन्न, गट शेती ठरेल फायद्याची, कृषी तज्ज्ञांनी दिला महत्त्वाचा सल्ला, Video Agniveer-Bharti-2026: भावांनो, लागा तयारीला…! कोल्हापुरात 14 सप्टेंबरपासून अग्निवीर भरती, कुणाला संधी? CRIME : रात्री बायकोसोबत ‘आखाड पार्टी’ केली अन् सकाळी शुद्धीत येताच डोक्यात कुकरचं झाकण घालून संपवलं! शिक्ष… Maratha OBC Reservation: मराठा आरक्षणाचा वाद पुन्हा पेटणार? जरांगेंच्या आक्रमकतेला उत्तर देण्यासाठी OBC सम…
SP News Maregaon

वादळाने केळीचे पीक उद्ध्वस्त; घरांवरील पत्रे गेली उडून:जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्याला बसला वादळी पावसाचा तडाखा

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यातील दानापूर परिसरात सोमवारी सायंकाळी सात वाजेनंतर आलेल्या जोरदार वादळी पावसामुळे केळीच्या बागांचे प्रचंड नुकसान झाले. अनेक शेतकऱ्यांच्या केळीच्या बागा अक्षरश: झोपल्या आहेत. दानापूर परिसरात सोसाट्याच्या वाऱ्यामुळे अनेकांच्या घरांवरील टिनाचे पत्रे उडून गेले आहेत. यामुळे मोठे नुकसान झाले आहे. तेल्हारा तालुक्यातील दहीगाव येथे अल्पभूधारक शेतकरी प्रमोद गुणवंत अवताडे यांच्या घराला या वादळाचा मोठा फटका बसला असून, त्यांच्या घरावरील छप्पर लोखंडी अँगलसह उडून गेले आहे. या घटनेत घरातील अन्नधान्य, जीवनावश्यक वस्तू आणि इतर साहित्याचे प्रचंड नुकसान झाले असून, त्यांच्या कुटुंबासमोर जगण्याच्या अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत. अकोट ८.३ तेल्हारा ८.० बाळापूर ८.७ पातूर १०.४ अकोला ८.९ बार्शीटाकळी ९.९ मूर्तिजापूर ९.७ एकूण ९.१ सर्वसामान्यांचे प्रचंड नुकसान याव्यतिरिक्त, तेल्हारा शहरातील उंबरकर नगर परिसरातील एका गोदामावरील पत्रे या वादळी वाऱ्यामुळे उडून गेले आहेत. अचानक आलेल्या या भयंकर वादळामुळे परिसरातील ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. सुरक्षिततेचा उपाय म्हणून त्यांनी जीवनावश्यक वस्तूंची साठवणूक करुन ठेवली आहे. या नैसर्गिक संकटामुळे सर्वसामान्य नागरिकांचे प्रचंड नुकसान झाले. सर्व नुकसानग्रस्तांना शासनाने तातडीने मदत द्यावी, अशी मागणी केली जात आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर