ब्रेकिंग न्यूज
पिसगाव येथे मिस्त्री कामगाराची गळफास घेऊन आत्महत्या Dhiraj Pardeshi Case Update | धीरज परदेशी प्रकरणी पोलिसांची कारवाई | Ahilyanagar Crime News पावसाळ्यात जनावराच्या तोंडाला अन् जिभेवर फोड, असू शकतो गंभीर आजराचा धोका, अशी घ्या काळजी वाह रे मित्र…! घरी आला, खाल्लं, पिलं अन् जाता जाता…, कोल्हापूर पोलिसांनी 24 तासांत उचललं महाआवास अभियानात प्रतीक्षा गाडगे यांची दमदार कामगिरी Shravan Astrology: श्रावणात ग्रह फिरले, कुणाला संधी तर कुणावर संकट. मेष ते मीन राशीवाले काय काळजी घ्याल? खर्च कमी अन् मिळेल भरघोस उत्पन्न, गट शेती ठरेल फायद्याची, कृषी तज्ज्ञांनी दिला महत्त्वाचा सल्ला, Video Agniveer-Bharti-2026: भावांनो, लागा तयारीला…! कोल्हापुरात 14 सप्टेंबरपासून अग्निवीर भरती, कुणाला संधी? CRIME : रात्री बायकोसोबत ‘आखाड पार्टी’ केली अन् सकाळी शुद्धीत येताच डोक्यात कुकरचं झाकण घालून संपवलं! शिक्ष… Maratha OBC Reservation: मराठा आरक्षणाचा वाद पुन्हा पेटणार? जरांगेंच्या आक्रमकतेला उत्तर देण्यासाठी OBC सम…
SP News Maregaon

मांगी येथे केबल चोरट्यांचा धुमाकूळ, 130 हून अधिक शेतकऱ्यांचे नुकसान:गेल्या 3 महिन्यांत दुसऱ्यांदा चोरी झाल्याने शेतकऱ्यांमध्ये संताप

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


पांडे करमाळा तालुक्यात शेती पंपाच्या केबल व तांब्याच्या तारा चोरीच्या घटनांचे सत्र थांबण्याचे नाव घेत नसल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. ऐन उन्हाळ्यात पिकांना पाणी देण्याची गरज असताना चोरट्यांनी पुन्हा एकदा मांगी तलावाच्या सांडवा परिसरातील शेतकऱ्यांना लक्ष्य केले आहे. शनिवार दि. ३० मे रोजीच्या मध्यरात्री झालेल्या चोरीत १३० हून अधिक शेतकऱ्यांच्या शेतीपंपांच्या १५ हजार फुटांहून अधिक केबलमधील तांब्याच्या तारा चोरट्यांनी लंपास केल्या आहेत. उन्हाळ्यात शेतातील पिके वाचवण्यासाठी शेतकरी महावितरणकडून मिळणाऱ्या ठराविक वेळेच्या वीजपुरवठ्यावर अवलंबून असतात. मात्र रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत चोरटे शेतीपंपांच्या केबल कापून त्यातील तांब्याच्या तारा चोरून नेत असल्याने शेतकऱ्यांसमोर दुहेरी संकट उभे राहिले आहे. मांगी परिसरात गेल्या तीन महिन्यांत दुसऱ्यांदा अशी मोठी चोरी झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीती व संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. यापूर्वीही तालुक्यातील गुलमोहरवाडी, पोमलवाडी, हिंगणी, सोगाव, उंदरगाव, केत्तुर, वाशिंबे व खातगाव या उजनीकाठच्या गावांमध्ये मोठ्या प्रमाणात शेतीपंपांमधील तांब्याच्या तारा चोरीच्या घटना घडल्या गुढीपाडव्याला २५ शेतकरी चोरीचे बळी ^दि. १९ मार्च रोजी झालेल्या चोरीत माझी सुमारे ७० फूट केबल चोरीला गेली होती. आता पुन्हा १०० फूट केबल चोरट्यांनी नेली आहे. आधीच पाण्याची टंचाई आणि अपुरा वीजपुरवठा यामुळे शेतातील पिके करपू लागली आहेत. त्यातच वारंवार केबल चोरी होत असल्याने मोठा आर्थिक फटका बसला आहे. – नितीन नरसाळे, शेतकरी, मांगी. सांडवा परिसरात यापूर्वी गुढीपाडव्याच्या दिवशी, दि. १९ मार्च रोजी २५ शेतकऱ्यांच्या शेतीपंपांच्या केबल चोरीला गेल्या होत्या. त्या वेळी शेतकऱ्यांनी पोलिसांकडे तक्रार केली होती. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी व पंचनामा केल्याचे सांगण्यात आले. मात्र त्यानंतर या प्रकरणात नेमकी काय कारवाई झाली, याबाबत आजही अनेक शेतकऱ्यांमध्ये संभ्रम आहे. आहेत. शेतकऱ्यांना वारंवार नवीन केबल खरेदी करावी लागत असल्याने आर्थिक भार वाढत आहे. चोरट्यांचा बंदोबस्त करण्यासाठी पोलिसांनी विशेष मोहीम राबवून गस्त वाढवावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर