ब्रेकिंग न्यूज
पिसगाव येथे मिस्त्री कामगाराची गळफास घेऊन आत्महत्या Dhiraj Pardeshi Case Update | धीरज परदेशी प्रकरणी पोलिसांची कारवाई | Ahilyanagar Crime News पावसाळ्यात जनावराच्या तोंडाला अन् जिभेवर फोड, असू शकतो गंभीर आजराचा धोका, अशी घ्या काळजी वाह रे मित्र…! घरी आला, खाल्लं, पिलं अन् जाता जाता…, कोल्हापूर पोलिसांनी 24 तासांत उचललं महाआवास अभियानात प्रतीक्षा गाडगे यांची दमदार कामगिरी Shravan Astrology: श्रावणात ग्रह फिरले, कुणाला संधी तर कुणावर संकट. मेष ते मीन राशीवाले काय काळजी घ्याल? खर्च कमी अन् मिळेल भरघोस उत्पन्न, गट शेती ठरेल फायद्याची, कृषी तज्ज्ञांनी दिला महत्त्वाचा सल्ला, Video Agniveer-Bharti-2026: भावांनो, लागा तयारीला…! कोल्हापुरात 14 सप्टेंबरपासून अग्निवीर भरती, कुणाला संधी? CRIME : रात्री बायकोसोबत ‘आखाड पार्टी’ केली अन् सकाळी शुद्धीत येताच डोक्यात कुकरचं झाकण घालून संपवलं! शिक्ष… Maratha OBC Reservation: मराठा आरक्षणाचा वाद पुन्हा पेटणार? जरांगेंच्या आक्रमकतेला उत्तर देण्यासाठी OBC सम…
SP News Maregaon

वादळी पावसाने दिलासा; मात्र उकाड्याने जीव होतो कासावीस:यवतमाळ, दिग्रसमध्ये पाऊस; अनेक गावांचा वीजपुरवठा ठप्प‎

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


नवतपाच्या कडाक्याच्या उष्णतेने होरपळणाऱ्या यवतमाळ जिल्ह्याला सोमवारी रात्री झालेल्या वादळी पावसाने काहीसा दिलासा दिला असला तरी, यवतमाळ शहरासह दिग्रस तालुक्यात अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने हजेरी लावली होती. अचानक झालेल्या या बदलामुळे वातावरणात काहीसा गारवा निर्माण झाला आणि उष्णतेने त्रस्त झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला असला तरी दुसऱ्याच दिवशी उकाडा वाढल्याने घामाने अंगाची लाहीलाही होत होती. मात्र हा दिलासा फार काळ टिकला नाही. मंगळवारी सकाळपासूनच सूर्याने पुन्हा तडाखा देण्यास सुरुवात केली. दुपारपर्यंत तापमानात झपाट्याने वाढ झाल्याने शहरासह ग्रामीण भागात उकाड्याची तीव्रता पुन्हा जाणवू लागली. दुपारच्या वेळेत रस्त्यांवर नागरिकांची वर्दळ कमी झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. सोमवारी रात्रीच्या वादळामुळे जिल्ह्यातील काही भागांमध्ये झाडे कोसळणे, वीजवाहिन्यांचे नुकसान होणे आणि वीजपुरवठा खंडित होण्याच्या घटना घडल्या. अनेक गावांमध्ये २४ तास उलटूनही वीजपुरवठा सुरळीत झालेला नसल्याने नागरिकांना विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. विशेषतः पिण्याच्या पाण्याच्या पुरवठ्यावर परिणाम झाल्याने ग्रामीण भागातील नागरिकांची गैरसोय वाढली आहे. वीज वितरण कंपनीकडून युद्धपातळीवर दुरुस्तीचे काम सुरू असून खंडित झालेला पुरवठा पूर्ववत करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. शेतकऱ्यांचे पावसाकडे लक्ष हवामान विभागाने पुढील काही दिवस जिल्ह्यात ढगाळ वातावरण राहण्यासह काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. मान्सूनच्या आगमनापूर्वीच वातावरणात होत असलेल्या बदलांमुळे शेतकरी आणि नागरिकांचे लक्ष आता पावसाकडे लागले असून, यंदा मान्सूनची अधिकृत एंट्री कधी होते याबाबत उत्सुकता वाढली आहे. जिल्ह्यातील नागरिकांना उष्णतेपासून कायमस्वरूपी दिलासा मिळण्यासाठी आता सर्वांची नजर मान्सूनच्या आगमनावर खिळली आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर