ब्रेकिंग न्यूज
महाआवास अभियानात प्रतीक्षा गाडगे यांची दमदार कामगिरी Shravan Astrology: श्रावणात ग्रह फिरले, कुणाला संधी तर कुणावर संकट. मेष ते मीन राशीवाले काय काळजी घ्याल? खर्च कमी अन् मिळेल भरघोस उत्पन्न, गट शेती ठरेल फायद्याची, कृषी तज्ज्ञांनी दिला महत्त्वाचा सल्ला, Video Agniveer-Bharti-2026: भावांनो, लागा तयारीला…! कोल्हापुरात 14 सप्टेंबरपासून अग्निवीर भरती, कुणाला संधी? CRIME : रात्री बायकोसोबत ‘आखाड पार्टी’ केली अन् सकाळी शुद्धीत येताच डोक्यात कुकरचं झाकण घालून संपवलं! शिक्ष… Maratha OBC Reservation: मराठा आरक्षणाचा वाद पुन्हा पेटणार? जरांगेंच्या आक्रमकतेला उत्तर देण्यासाठी OBC सम… India Vs Sri Lanka : ‘सरफराज खानला क्लियारिटी द्या…’, गंभीरला झापलं! मुंबईकर खेळाडूसाठी मैदानात उतरला 765… Chandrapur : खेळता खेळता बाळाने ट्यूबचं टोपण गिळलं,कुटुंबियांच्या काळजाचा ठोका चुकला, पुढे काय घडलं? उभ्या ट्रकला दुचाकीची मागून जोरदार धडक; तरुण गंभीर जखमी मारेगावच्या वारंवार वीजखंडितीविरोधात नागरिक आक्रमक; सात दिवसांचा अल्टिमेटम
SP News Maregaon

जागतिक महासागर दिन विशेष‎:महासागर खेचतोय मान्सूनचे ढग, पावसाची 8 टक्के तूट शक्य; 10 वर्षांत तिसऱ्यांदा कमी पाऊस‎

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


महासागरातील तापमानातील बदलानुसार‎पर्जन्यमानात मोठे बदल पहायला मिळतात.‎मागील दहा वर्षातील पर्जन्यमान पाहता,‎अहिल्यानगर जिल्ह्यात दर दोन ते चार‎वर्षांनी पर्जन्यमान कमी झाल्याचे दिसून‎येते. यापूर्वी २०२३ मध्ये कमी पाऊस झाला‎होता. आता पुन्हा २०२६ मध्ये पॅसिफिक‎महासागराचे तापमान‎ ०.५ अंशापेक्षा अधिक वाढल्याने,‎ एलनिनोचा प्रभाव निर्माण झाला. त्यामुळे‎ अहिल्यानगरसह भारतातील मान्सूनचे‎ ढग तिकडे ओढले जाऊन आठ ते दहा‎टक्के कमी पाऊस होण्याचा अंदाज‎ आहे. मे महिन्यात, समुद्रातील तापमान‎२९.८ अंश सेल्सिअस होते.‎ पॅसिफिकमध्ये तापमान वाढून, कमी दाब‎निर्माण झाला असल्याने, विषुवृत्तीय‎क्षेत्रातील हवेच्या प्रवाहाची दिशा बदलत‎आहे. परिणामी जे वारे भारतासह‎अहिल्यानगरकडे ओलावा घेऊन‎यायला हवे होते, ते पॅसिफिकच्या‎महासागराकडे खेचले जात आहेत.‎त्यामुळे हिंद महासागरातील मान्सून‎वाऱ्याची तागद व आर्द्रता कमी होऊन‎पर्जन्यमानावर परिणाम होऊन एलनिनोचे‎संकट गडद झाले आहे.‎ एलनिनोचा प्रभाव असला तरी‎शेतकऱ्यांनी पीक नियोजन कसे करावे,‎यासाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठाने‎मार्गदर्शक अहवाल तयार केला आहे.‎एल निनो पॅसिफिक महासागरात उष्णता‎वाढवून हिंद महासागरातील मान्सून‎वाऱ्यांची खेचण्याची ताकद कमी करतो,‎ज्यामुळे भारताचे मान्सून चक्र‎विस्कळीत होऊ शकते. जिल्ह्याचा‎विचार करता, मागील दहा वर्षांत २०१५‎मध्ये कमी पाऊस झाल्याने दुष्काळी‎स्थिती निर्माण झाली होती. तसेच २०१८‎व २०२३ मध्येही तिव्र टंचाईचा सामना‎करावालागला. परंतू, दर दोन ते तीन‎वर्षानंतर पुन्हा दमदार पाऊस झाल्याचे‎आकडेवारीवरून स्पष्ट होते.‎ पाऊस कमी पडेल, तुम्ही हे करा!‎ पावसाचे आगमन उशिरा झाल्यास घाईने पेरणी करणे टाळावे,‎किमान ८०-१०० मि.मी. पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नये.‎जमीनीचे तापमान ४० ते ५० अंशावर आहे. या काळात पेरणी‎केल्यास उगवन कमी होते. त्यामुळे जमिनीचे तापमान किमान १८‎ते २५ असायला हवे. जमिनीच्या खोलीनुसार पिकांची निवड‎करा; हलक्या जमिनीत बाजरी, मटकी, हुलगा तर मध्यम ते खोल‎जमिनीत तूर, सूर्यफूल, रब्बी ज्वारी यांसारख्या पिकांचे नियोजन‎करावे, असा सल्ला आपत्कालीन पीक व्यवस्थापनात दिला आहे.‎ पाणी आणि ओलावा व्यवस्थापन‎ पावसाचा खंड पडल्यास पिकांचे नुकसान टाळण्यासाठी सरी-वरंबे,‎बंदिस्त वाफे आणि मुलस्थानी जलसंधारणाचे उपाय अवलंबावेत.‎जमिनीतील ओलावा टिकवून ठेवण्यासाठी पिकांच्या दोन ओळींत‎पाचट, काडीकचरा यांसारख्या अवशेषांचे आच्छादन वापरावे,‎ज्यामुळे २५ ते ३० मि.मी. ओलाव्याची बचत होते.‎

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर