ब्रेकिंग न्यूज
Maratha OBC Reservation: मराठा आरक्षणाचा वाद पुन्हा पेटणार? जरांगेंच्या आक्रमकतेला उत्तर देण्यासाठी OBC सम… India Vs Sri Lanka : ‘सरफराज खानला क्लियारिटी द्या…’, गंभीरला झापलं! मुंबईकर खेळाडूसाठी मैदानात उतरला 765… Chandrapur : खेळता खेळता बाळाने ट्यूबचं टोपण गिळलं,कुटुंबियांच्या काळजाचा ठोका चुकला, पुढे काय घडलं? उभ्या ट्रकला दुचाकीची मागून जोरदार धडक; तरुण गंभीर जखमी मारेगावच्या वारंवार वीजखंडितीविरोधात नागरिक आक्रमक; सात दिवसांचा अल्टिमेटम Kolhapur: चारित्र्याचा संशय, गाडीवरून जातानाच बिनसलं, पतीनं…, भरदिवसा कोल्हापूरच्या रस्त्यावर थरार Konkan Railway: कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी गुड न्यूज, विशेष रेल्वेला अतिरिक्त थांबे, पण कुठे? पतीच्या व्हॉट्सॲपवरून नंबर घेतला, त्याला अडचण सांगितली, 26 वर्षांच्या विवाहितेला ‘ती’ चूक भोवली, छ. संभाजी… FDA News | अन्नाच्या नावाखाली काळा धंदा! FDA कडून पर्दाफाश | Tukaram Mundhe News | Special Report Satish Maratha Murder : ‘प्रत्येक चौकात मीच टिकणार…’, सतीश मराठावर 39 सपासप वार करण्याआधी राहुलचा शेवटचा …
SP News Maregaon

उबाठा संपवण्याची स्क्रिप्ट तयार:राऊत राहुल गांधींची सुपारी घेऊन उबाठा-पवार गट संपवण्याच्या मोहिमेवर- नवनाथ बन

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


उद्धव ठाकरेंना नेतृत्व करता येत नाही आणि आदित्य ठाकरे घरात बसून आहेत उबाठाचे अस्तित्व टिकून ठेवायचे असेल तर आपला पक्ष काँग्रेसमध्ये विलीन केला पाहिजे, अशी भूमिका संजय राऊत घेतील. उबाठाचे लोकसभेचे 9 आणि राज्यसभेचे खासदार संजय राऊत हे 10 खासदार वेगवेगळ्या पक्षात जाणार आहेत. काही जण संजय राऊत यांच्यासोबत काँग्रेसमध्ये जातील तर काही जण शिंदेंचे नेतृत्व स्वीकारतील, असे भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी म्हटले आहे. नवनाथ बन म्हणाले की, न्यायाधीश आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये सहभाग घेणे ही न्यायव्यवस्थेची नियमित प्रक्रिया आहे. काँग्रेसच्या काळात सुद्धा हे होत होते. उद्धव ठाकरे पहलगाम हल्ल्यानंतर कुठे होते, याचे उत्तर राऊतांनी द्यावे, ते त्यावेळी लंडनवारीमध्ये मजा करत होते त्यावर राऊतांनी बोलले पाहिजे. उबाठा-राष्ट्रवादी संपवण्याची राऊतांनी सुपारी घेतली नवनाथ बन म्हणाले की, संजय राऊत यांच्या पोटात आहे ते ओठांवर यायला लागले आहे. त्यांनी आज सांगितले की तृणमूल काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने आपला पक्ष काँग्रेसमध्ये विलीन केला पाहिजे. येणाऱ्या काळात राऊत असेही म्हणतील की उबाठाचे अस्तित्व संपत आले आहे ते टिकण्यासाठी त्यांनी सुद्धा काँग्रेसमध्ये विलीन झाले पाहिजे. संजय राऊत यांनी काँग्रेसकडून उबाठा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष संपवण्याची सुपारी घेतली आहे. येणाऱ्या काळात केवळ काँग्रेसच पक्ष जिंवत राहिला पाहिजे ही सुपारी राऊतांनी राहुल गांधींकडून घेतली आहे. तृणमूलचे नेते ममतांच्या दहशतीला कंटाळले नवनाथ बन म्हणाले की, तृणमूल काँग्रेसचे नेते ममता बॅनर्जी यांच्या दहशतीला कंटाळले आहेत. म्हणून त्यांनी आपला वेगळा गट स्थापन केला आहे. तो येणाऱ्या काळात आपली वेगळी भूमिका मांडणार आहे. राऊतांनी आपल्याकडे लक्ष दिले पाहिजे. संजय राऊत नारी सन्मानाबद्दल बोलूच नका. तुमच्या हातात जनतेने घंटा दिला आहे. नारी सन्मानाबद्दल तुम्ही बोलू नका, तुम्ही महिलांना शिवीगाळ करता आणि तुम्ही महिलांच्या सन्मानावर बोलू नका तो अधिकार तुम्हाला नाहीच. आमचा शक्तीपीठ महामार्गाला विरोध- आमदार पाटील आमदार शिवाजी पाटील म्हणाले की, शक्तीपीठ महामार्ग झाला तर आमचा मतदारसंघाच्या विकासाला चालना मिळू शकते. म्हणून आमचा या महामार्गाल पाठिंबा आहे. आमचा भाग अजूनही दुर्लक्षित आहे, काँग्रेसच्या काळात काहीच विकास आमच्या भागात झाले नाही. या महामार्गामुळे आमचा भाग विकसित होऊ शकेल. 60 हजार कोटी रुपयांचा घोटाळा होणार असा आरोप करणाऱ्या लोकांनी या रस्त्याचे काम घ्यावे आणि कमाई करावी. विरोधकांनी केवळ देवेंद्र फडणवीस यांची प्रतिमा मलिन करण्याचे काम करू नये.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर