Shopping Cart
Total:

$0.00

Items:

0

Your cart is empty
Keep Shopping

मस्साजोगमध्ये सरपंचपदासाठी चुरस:संतोष देशमुख यांच्याकडून पराभूत झालेले स्वरूपानंद देशमुख मैदानात, अश्विनी देशमुखही सज्ज

मस्साजोग ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाच्या पोटनिवडणुकीत मोठा राजकीय कलाटणी देणारा ट्विस्ट समोर आला आहे. ही निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी गावात प्रयत्न सुरू असतानाच, दिवंगत संतोष देशमुख यांच्याकडून पूर्वी पराभूत झालेले स्वरूपानंद देशमुख यांनी अचानक रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता या निवडणुकीत चुरस निर्माण होण्याची शक्यता वाढली आहे. स्वरूपानंद देशमुख यांनी आपण सरपंचपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचे स्पष्ट केले आहे. आज दुपारी एक ते तीन या वेळेत ते आपला अर्ज सादर करणार आहेत. गावातील लोकांनी बिनविरोध निवडणुकीची इच्छा व्यक्त केली तर आम्ही त्याचा आदर करू, पण अंतिम निर्णय मतदारच घेतील, असे त्यांनी सांगितले. गावात एकूण 2,284 मतदार असून, 29 तारखेला सगळं स्पष्ट होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. दरम्यान, दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या या पदासाठी त्यांच्या पत्नी अश्विनी देशमुख यांनाही उमेदवारी देण्याचा निर्णय देशमुख कुटुंबीयांनी घेतला आहे. त्या आज सकाळी साध्या पद्धतीने अर्ज दाखल करणार आहेत. कुटुंबीयांशी चर्चा आणि ग्रामस्थांचा सल्ला घेऊन हा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले. अश्विनी देशमुख यांनी प्रतिक्रिया देताना, ही निवडणूक बिनविरोध व्हायला हवी होती, असे मत व्यक्त केले. अण्णांचे अपूर्ण स्वप्न आम्ही पूर्ण करू. गावात पाणीटंचाई होऊ नये आणि विकासाची कामे थांबू नयेत, यासाठी आम्ही प्रयत्न करू, असे त्या म्हणाल्या. तसेच लोकशाहीत प्रत्येकाला निवडणूक लढवण्याचा अधिकार असल्याचे सांगत त्यांनी स्वरूपानंद देशमुख यांच्या उमेदवारीवर संयमित प्रतिक्रिया दिली. या घडामोडींवर धनंजय देशमुख यांनीही आपली भूमिका मांडली. त्यांनी सांगितले की, आजचा अर्ज साध्या पद्धतीने दाखल केला जाणार आहे. संतोष देशमुख यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. ज्यांनी आपला माणूस गमावला आहे, त्यांनाच त्या दुःखाची जाणीव असते. गावाने आमच्या वहिनींच्या पाठीशी उभे राहावे, असे आवाहन त्यांनी केले. नव्या सरपंचाचा कार्यकाळ सुमारे 18 महिन्यांचा दरम्यान, संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर रिक्त झालेल्या या पदासाठी निवडून येणाऱ्या नव्या सरपंचाचा कार्यकाळ सुमारे 18 महिन्यांचा असणार आहे. त्यामुळे या निवडणुकीकडे केवळ गावाचाच नव्हे, तर जिल्ह्याचाही लक्ष लागले आहे. आता बिनविरोधीचा मार्ग मोकळा होतो की थेट लढत रंगते, हे येत्या काही दिवसांत स्पष्ट होणार आहे.

Read Also:
0
Show Comments (0) Hide Comments (0)
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest
0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
Recent Posts:
error: Content is protected !!