मराठवाड्यात जून महिना उजाडल्यानंतरही बँकांकडून केवळ 14 टक्केच पीककर्ज वाटप झाले आहे. मागील वर्षीच्या तुलनेत कर्ज वाटप 3 टक्के अधिक आहे तरीही नेहमीप्रमाणे गतीसंथच असल्याचे चित्र आहे. पेरणीच्या तोंडावर आता शेतकऱ्यांना तातडीने पीक कर्ज वाटप करावे, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे. मराठवाड्यात यावर्षी सुमारे 49.33 लाख हेक्टरवर खरीप पेरणीचा अंदाज आहे. यामध्ये प्रामुख्याने सोयाबीनची 26.11 लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी होण्याचा अंदाज आहे. त्यापाठोपाठ 12.80 लाख हेक्टर क्षेत्रावर कापसाची लागवड होण्याचा अंदाज आहे. याशिवाय तूर,उडीद, मूग, बाजरीची सुमारे 4.30 लाख हेक्टरवर पेरणी होण्याचा अंदाज आहे. मका 3.55 लाख हेक्टरवर पेरणी होण्याचा अंदाज आहे. छत्रपती संभाजीनगर व जालना जिल्ह्यात मका पिकाचे क्षेत्र अधिक असणार आहे. दरम्यान, या वर्षी मराठवाड्यात आठही जिल्ह्यांमधून 11188 कोटी रुपयांचे पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्यानुसार जिल्हा मध्यवर्ती बँकेमार्फत 3306 कोटी, राष्ट्रीयीकृत बँकेमार्फत 5821 कोटी, महाराष्ट्र ग्रामीण बँकेमार्फत 2061 कोटी रुपयांचे कर्ज वाटपाचे उद्दिष्ट दिले आहे. मात्र प्रत्यक्षात आतापर्यंत केवळ 1576 कोटी रुपये, म्हणजेच केवळ 14.09 टक्केच कर्ज वाटप झाले आहे. मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यांमधून बँकांकडून कर्ज वाटपाचे काम संथगतीने सुरू आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे चित्र आहे. मराठवाड्यात मागील वर्षी या कालावधीत 1395 कोटी रुपयांचे कर्ज वाटप झाले होते. त्याची टक्केवारी 11.05 टक्के होती. थेट प्रश्न सुजित झोडगे, जिल्हा अग्रणी बँक, हिंगोली Q. कर्ज वाटपाची गती संथ का आहे? A. तसे म्हणता येणार नाही. मागील वर्षीच्यातुलनेत कर्ज वाटप तीन टक्के अधिक आहे. Q. या वर्षी किती कर्ज वाटप होणार का? A. मागील वर्षी मराठवाड्यात 69 टक्के कर्जवाटप झाले आहे. मात्र या वर्षी 75 टक्क्यांपेक्षाअधिक कर्ज वाटप होईल. Q. कर्ज वाटपाचे नियोजन कसे आहे? A. जास्तीत जास्त शेतकऱ्यांना सुलभतेनेकर्ज मिळावे यासाठी मराठवाड्यातील सर्वचजिल्ह्यांतून प्रयत्न होत आहेत. काही ठिकाणीप्रत्येक गावामधून कर्ज वाटपाचे शिबिरआयोजित केले जात आहे. लातूर 271 कोटींचे (237 कोटी) कर्ज वाटपझाले. धाराशिव 225 कोटी (194 ), बीड 180कोटी (152), नांदेड 204 कोटी (86), छत्रपतीसंभाजीनगर 392 कोटी (361), जालना 160कोटी (199), परभणी 95 कोटी (81). हिंगोली जिल्ह्यात या वर्षी 46 कोटींचे कर्जवाटप झालेआहे. मागील वर्षी 82 कोटींचे कर्ज वाटप झाले. 1.88 लाख शेतकऱ्यांना लाभ मराठवाड्यात आतापर्यंत 1.88 लाख शेतकऱ्यांना1576 कोटींचे कर्ज वाटप झाले. जिल्हा मध्यवर्तीबँकेकडून 1.24 लाख शेतकऱ्यांना 752 कोटी,राष्ट्रीयीकृत बँकेकडून 31413 शेतकऱ्यांना 550कोटी, महाराष्ट्र ग्रामीण बँकेकडून 32316शेतकऱ्यांना 273 कोटींचे कर्ज वाटप झाले.
