Skip to content
ब्रेकिंग न्यूज:
गोदावरी नदीत बुडून एकाच कुटुंबातील तिघींचा अंत:दोन सख्ख्या बहिणींना वाचवताना चुलत बहीणही बुडाली, परभणीतील घटना | गडचिरोलीत पहिली मोफत गुडघा प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी:असह्य गुडघेदुखीमुळे चालणे-फिरणे कठीण झालेल्या महिलेला दिलासा | बोरीवली स्थानकाचा पुनर्विकास करा अन् थेट ‘बोरीवली-कल्याण’ लोकल सुरू करा:आमदार संजय उपाध्याय यांचे रेल्वेमंत्र्यांना पत्र | पहिल्याच पावसात शासनाच्या गोदामातील हरभरा भिजला:अशा दुर्घटना होतच असतात, व्यवस्थापकिय संचालकांची संतप्त प्रतिक्रिया | फलटणच्या सह दुय्यम निबंधकांवर शासनाची मोठी कारवाई:1,545 दस्तांच्या संशयास्पद नोंदणीप्रकरणी दिपक पवार निलंबित
SP News Maregaon
गोदावरी नदीत बुडून एकाच कुटुंबातील तिघींचा अंत:दोन सख्ख्या बहिणींना वाचवताना चुलत बहीणही बुडाली, परभणीतील घटना

गोदावरी नदीत बुडून एकाच कुटुंबातील तिघींचा अंत:दोन सख्ख्या बहिणींना वाचवताना चुलत बहीणही बुडाली, परभणीतील घटना

3 hours पूर्वी · 1 min read

auto_awesomeथोडक्यात महत्त्वाचे

परभणी जिल्ह्यातील सोनपेठ तालुक्यातून एक अत्यंत हृदयद्रावक आणि खळबळजनक बातमी समोर आली आहे. तालुक्यातील मोहळा येथे आज, रविवार (१४ जून) रोजी सकाळी गोदावरी नदीत आंघोळीसाठी गेलेल्या दोन सख्ख्या बहिणींचा पाण्यात...

परभणी जिल्ह्यातील सोनपेठ तालुक्यातून एक अत्यंत हृदयद्रावक आणि खळबळजनक बातमी समोर आली आहे. तालुक्यातील मोहळा येथे आज, रविवार (१४ जून) रोजी सकाळी गोदावरी नदीत आंघोळीसाठी गेलेल्या दोन सख्ख्या बहिणींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. धक्कादायक म्हणजे, या दोघींना डोळ्यांदेखत बुडताना पाहून त्यांना वाचवण्यासाठी नदीपात्रात उडी घेतलेली त्यांची चुलत बहीणही पाण्याचा अंदाज न आल्याने बुडाली. एकाच कुटुंबातील तिघींचा असा दुर्दैवी अंत झाल्याने संपूर्ण परभणी जिल्ह्यावर शोककळा पसरली असून जाधव कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मोहळा येथील रहिवासी असलेल्या उत्कर्षा उत्तम जाधव (वय १८ वर्ष) आणि समीक्षा उत्तम जाधव (वय १६ वर्ष) या दोन सख्ख्या बहिणी आज रविवारी सकाळी साडेसातच्या सुमारास गावाशेजारील गोदावरी नदीकाठी आंघोळीसाठी गेल्या होत्या. नदीपात्रात आंघोळ करत असताना दोघींनाही पाण्याचा अंदाज आला नाही आणि त्या अचानक खोल पाण्यात बुडू लागल्या. त्यांनी वाचवण्यासाठी आरडाओरड सुरू केली. बहिणींना वाचवण्याचा चुलत बहिणीचा प्रयत्न अपयशी दोन्ही सख्ख्या बहिणी पाण्यात बुडत असल्याचे तिथेच जवळ असलेल्या त्यांच्या चुलत बहीण सिंधू दत्ता जाधव (वय ४५ वर्ष) यांच्या निदर्शनास आले. आपल्या बहिणींचे प्राण संकटात असल्याचे पाहून सिंधू जाधव यांनी कोणतीही तमा न बाळगता त्यांना वाचवण्यासाठी थेट गोदावरी नदीच्या पात्रात धाव घेतली. त्यांनी दोघींना उपसण्याचा आणि वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न केला. मात्र, नदीतील पाण्याचा वेग आणि खोली जास्त असल्याने, दुर्दैवाने त्या स्वतःदेखील पाण्यात बुडाल्या. ग्रामस्थांची धाव, पण तोपर्यंत उशीर झाला… नदीकाठावरील काही नागरिकांनी हा प्रकार पाहिल्यानंतर त्यांनी तात्काळ गावातील इतर नातेवाईक आणि ग्रामस्थांना याची माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी मोठ्या संख्येने गोदावरी नदीकाठाकडे धाव घेतली आणि तातडीने शोधकार्य सुरू केले. काही वेळाच्या अथक प्रयत्नांनंतर ग्रामस्थांनी तिघींनाही नदीपात्रातून बाहेर काढले. मात्र, तोपर्यंत उशीर झाला होता आणि अतिप्रमाणात पाणी पोटात गेल्याने तिघींचाही जागीच मृत्यू झाला होता. ग्रामस्थांनी अत्यंत जड अंतःकरणाने तिन्ही मृतदेह रुग्णवाहिकेद्वारे सोनपेठ येथील ग्रामीण (शासकीय) रुग्णालयात शवविच्छेदनासाठी रवाना केले. सोनपेठ पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद या दुर्दैवी घटनेची माहिती मिळताच सोनपेठ पोलिस ठाण्याचे पथक घटनास्थळी आणि रुग्णालयात दाखल झाले. या प्रकरणी दौलत जाधव यांनी दिलेल्या खबरीवरून सोनपेठ पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलिस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. एकाच घरातील दोन तरुण मुली आणि कुटुंबातील ज्येष्ठ महिला अशा तिघींचा एकाच वेळी मृत्यू झाल्याने मोहळा गावातील चूल आणि गोटा बंद ठेवून संपूर्ण गावाने जाधव कुटुंबाच्या दुःखात सहभाग घेतला आहे.

तुमची प्रतिक्रिया:
error: Content is protected !!