देशातील बदलत्या राजकीय समीकरणांवर भाष्य करताना काँग्रेस नेते हर्षवर्धन सपकाळ यांनी एक मोठे विधान केले आहे. देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना रोखण्यासाठी राहुल गांधी हाच एकमेव पर्याय आहे, असे सपकाळ यांनी म्हटले आहे. त्यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा नव्या चर्चा सुरू झाल्या आहेत. साम-दाम-दंड-भेद’चा वापर: सपकाळांचा घणाघात
स्थानिक स्वराज्य संस्था आणि विधान परिषद निवडणुकांमध्ये सत्ताधाऱ्यांनी पैशांचा अमाप वापर केल्याचा आरोप त्यांनी केला. एका वृत्तवाहिनीशी बोलताना सपकाळ म्हणाले, “सध्या ‘पैसा फेक तमाशा देख’ अशी परिस्थिती आहे. विरोधकांचे अर्ज तांत्रिक कारणांवरून बाद करणे, उमेदवारांवर दबाव आणून अर्ज मागे घ्यायला लावणे, असे प्रकार सुरू आहेत. सत्ताधारी साम-दाम-दंड-भेदाचा वापर करून निवडणुकीत थैमान घालत आहेत.” प्रादेशिक पक्षांचे विलीनीकरण होणार?
शरद पवारांची राष्ट्रवादी आणि ममता बॅनर्जींचा तृणमूल काँग्रेस पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार का? या प्रश्नावर त्यांनी सूचक उत्तर दिले. भाजपविरोधात देशात काँग्रेस हाच एकमेव सक्षम प्रवाह आहे. या पार्श्वभूमीवर अशा चर्चा रंगणे स्वाभाविक आहे, असे ते म्हणाले. नाराजीच्या चर्चा म्हणजे भाजपचा कट
काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी आणि नेत्यांच्या हायकमांडकडे गेलेल्या तक्रारींचे सपकाळांनी खंडन केले. काँग्रेस पक्षांतर्गत कोणतीही नाराजी नाही. काँग्रेसच्या आंदोलनांना मिळणारा जनतेचा प्रतिसाद पाहून घाबरलेल्या भाजपनेच या केवळ ‘वावड्या’ उठवल्या आहेत. असा टोला एबीपी माझाशी बोलताना त्यांनी लगावला. हे ही वाचा.. चर्चा विलीनीकरणाची, तयारी राजकीय महाभूकंपाची?:शरद पवारांच्या राष्ट्रवादीसह TMCला ऑफर! काय होणार देशाच्या आणि राज्याच्या राजकारणावर परिणाम? भारताच्या राजकारणात सध्या एका मोठ्या घडामोडीची दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे. काँग्रेसमधून बाहेर पडून स्वतःचे प्रादेशिक पक्ष स्थापन करणाऱ्या नेत्यांची पुन्हा काँग्रेसमध्ये ‘घरवापसी’ किंवा त्यांच्या पक्षांचे काँग्रेसमध्ये विलीनीकरण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. जर हे खरोखरच घडले, तर देशाच्या आणि विशेषतः महाराष्ट्राच्या राजकारणावर याचे दूरगामी परिणाम होतील. या सर्व संभाव्य राजकीय घडामोडींचा आणि इतिहासाचा घेतलेला हा सविस्तर आढावा. सविस्तर वाचा
