ब्रेकिंग न्यूज
Konkan Railway: कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी गुड न्यूज, विशेष रेल्वेला अतिरिक्त थांबे, पण कुठे? पतीच्या व्हॉट्सॲपवरून नंबर घेतला, त्याला अडचण सांगितली, 26 वर्षांच्या विवाहितेला ‘ती’ चूक भोवली, छ. संभाजी… FDA News | अन्नाच्या नावाखाली काळा धंदा! FDA कडून पर्दाफाश | Tukaram Mundhe News | Special Report Satish Maratha Murder : ‘प्रत्येक चौकात मीच टिकणार…’, सतीश मराठावर 39 सपासप वार करण्याआधी राहुलचा शेवटचा … Lumpy Skin Disease : जनावराला ताप अन् शरीरावर सूज, असू शकतो लम्पी आजाराचा धोका, अशी घ्या काळजी Video पुणेकर वाहतूक कोंडीचं टेन्शन सोडा! पाषाण ते कोथरूड अवघ्या 10 मिनिटांत, नेमका प्लॅन काय? ‘ओम नम: शिवाय’चा जप करत पोरानं मैदानात घातला तांडव! मॅच जिंकून दिली, कोण आहे वंश बेदी? पाहा Video Raj Thackeray News | तिसरी मुंबई कुणासाठी? राज ठाकरेंचा सवाल! | Special Report पत्नी अन् लेकरांना सोडून पोटाची खळगी भरण्यासाठी गाठलं महाराष्ट्र; पण कामावर जाताच संदीपसोबत भयंकर घडलं PM Kisan Samman Nidhi : शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! ‘या’ एका चुकीमुळे थांबणार पीएम-किसानचे ६,००० रुपये!
SP News Maregaon

मोदींना रोखण्यासाठी देशात आता काँग्रेस हाच एकमेव पर्याय:हर्षवर्धन सपकाळांचा दावा, निवडणुकांमध्ये सत्ताधाऱ्यांकडून पैशांचा अमाप वापर केल्याचा आरोप

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


देशातील बदलत्या राजकीय समीकरणांवर भाष्य करताना काँग्रेस नेते हर्षवर्धन सपकाळ यांनी एक मोठे विधान केले आहे. देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना रोखण्यासाठी राहुल गांधी हाच एकमेव पर्याय आहे, असे सपकाळ यांनी म्हटले आहे. त्यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा नव्या चर्चा सुरू झाल्या आहेत. साम-दाम-दंड-भेद’चा वापर: सपकाळांचा घणाघात
स्थानिक स्वराज्य संस्था आणि विधान परिषद निवडणुकांमध्ये सत्ताधाऱ्यांनी पैशांचा अमाप वापर केल्याचा आरोप त्यांनी केला. एका वृत्तवाहिनीशी बोलताना सपकाळ म्हणाले, “सध्या ‘पैसा फेक तमाशा देख’ अशी परिस्थिती आहे. विरोधकांचे अर्ज तांत्रिक कारणांवरून बाद करणे, उमेदवारांवर दबाव आणून अर्ज मागे घ्यायला लावणे, असे प्रकार सुरू आहेत. सत्ताधारी साम-दाम-दंड-भेदाचा वापर करून निवडणुकीत थैमान घालत आहेत.” प्रादेशिक पक्षांचे विलीनीकरण होणार?
शरद पवारांची राष्ट्रवादी आणि ममता बॅनर्जींचा तृणमूल काँग्रेस पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार का? या प्रश्नावर त्यांनी सूचक उत्तर दिले. भाजपविरोधात देशात काँग्रेस हाच एकमेव सक्षम प्रवाह आहे. या पार्श्वभूमीवर अशा चर्चा रंगणे स्वाभाविक आहे, असे ते म्हणाले. नाराजीच्या चर्चा म्हणजे भाजपचा कट
काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी आणि नेत्यांच्या हायकमांडकडे गेलेल्या तक्रारींचे सपकाळांनी खंडन केले. काँग्रेस पक्षांतर्गत कोणतीही नाराजी नाही. काँग्रेसच्या आंदोलनांना मिळणारा जनतेचा प्रतिसाद पाहून घाबरलेल्या भाजपनेच या केवळ ‘वावड्या’ उठवल्या आहेत. असा टोला एबीपी माझाशी बोलताना त्यांनी लगावला. हे ही वाचा.. चर्चा विलीनीकरणाची, तयारी राजकीय महाभूकंपाची?:शरद पवारांच्या राष्ट्रवादीसह TMCला ऑफर! काय होणार देशाच्या आणि राज्याच्या राजकारणावर परिणाम? भारताच्या राजकारणात सध्या एका मोठ्या घडामोडीची दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे. काँग्रेसमधून बाहेर पडून स्वतःचे प्रादेशिक पक्ष स्थापन करणाऱ्या नेत्यांची पुन्हा काँग्रेसमध्ये ‘घरवापसी’ किंवा त्यांच्या पक्षांचे काँग्रेसमध्ये विलीनीकरण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. जर हे खरोखरच घडले, तर देशाच्या आणि विशेषतः महाराष्ट्राच्या राजकारणावर याचे दूरगामी परिणाम होतील. या सर्व संभाव्य राजकीय घडामोडींचा आणि इतिहासाचा घेतलेला हा सविस्तर आढावा. सविस्तर वाचा

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर