ब्रेकिंग न्यूज
Konkan Railway: कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी गुड न्यूज, विशेष रेल्वेला अतिरिक्त थांबे, पण कुठे? पतीच्या व्हॉट्सॲपवरून नंबर घेतला, त्याला अडचण सांगितली, 26 वर्षांच्या विवाहितेला ‘ती’ चूक भोवली, छ. संभाजी… FDA News | अन्नाच्या नावाखाली काळा धंदा! FDA कडून पर्दाफाश | Tukaram Mundhe News | Special Report Satish Maratha Murder : ‘प्रत्येक चौकात मीच टिकणार…’, सतीश मराठावर 39 सपासप वार करण्याआधी राहुलचा शेवटचा … Lumpy Skin Disease : जनावराला ताप अन् शरीरावर सूज, असू शकतो लम्पी आजाराचा धोका, अशी घ्या काळजी Video पुणेकर वाहतूक कोंडीचं टेन्शन सोडा! पाषाण ते कोथरूड अवघ्या 10 मिनिटांत, नेमका प्लॅन काय? ‘ओम नम: शिवाय’चा जप करत पोरानं मैदानात घातला तांडव! मॅच जिंकून दिली, कोण आहे वंश बेदी? पाहा Video Raj Thackeray News | तिसरी मुंबई कुणासाठी? राज ठाकरेंचा सवाल! | Special Report पत्नी अन् लेकरांना सोडून पोटाची खळगी भरण्यासाठी गाठलं महाराष्ट्र; पण कामावर जाताच संदीपसोबत भयंकर घडलं PM Kisan Samman Nidhi : शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! ‘या’ एका चुकीमुळे थांबणार पीएम-किसानचे ६,००० रुपये!
SP News Maregaon

मोर्शी कॉलनी परिसरात पाणी टंचाई, गढूळ पाण्याचा पुरवठा:नागरिकांचे नगराध्यक्षांना निवेदन, 5 दिवसांत शुद्ध पाणी न मिळाल्यास आंदोलनाचा इशारा

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


मोर्शी शहरातील कॉलनी परिसरात नगर परिषद प्रशासनाच्या नियोजनशून्य कारभाराने तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली आहे. नागरिकांना अनियमित आणि गढूळ पाण्याचा पुरवठा होत असल्याने भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकांसह स्थानिकांनी नगराध्यक्षा प्रतीक्षाताई गुल्हाने यांना निवेदन दिले. येत्या पाच दिवसांत शुद्ध व मुबलक पाणी न मिळाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला. मोर्शी शहरात जुन्या आणि नवीन अशा दोन मोठ्या पाण्याच्या टाक्या (जलकुंभ) असून, त्यात पुरेसे पाणी साठवण्याची क्षमता आहे. असे असूनही समर्थ कॉलनी, गुरुदेव नगरी, गेडाम लेआउट, गजानन कॉलनी, छायानगर, साई सिटी लेआउट, दीप कॉलनी आणि राधाकृष्ण कॉलनीच्या काही भागांत पाणी पोहोचत नाही. जलवाहिनीला अनेक ठिकाणी गळती लागल्याने पाण्याची मोठ्या प्रमाणावर नासाडी होत आहे. कॉलनी परिसराला गढूळ आणि अशुद्ध पाणी मिळत असून, या गंभीर समस्येकडे प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नगरसेवकांनी केला आहे. नगरपरिषदेचा पाणीपुरवठा विभाग निष्क्रिय असून, त्याचे नियोजन ढिसाळ असल्यामुळे काही भागांत दूषित व दुर्गंधीयुक्त पाणी पोहोचत आहे. यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येऊन साथीचे रोग पसरण्याची भीतीही व्यक्त करण्यात आली. पाण्यामध्ये ब्लिचिंग पावडर आणि ॲलनचे प्रमाण असंतुलित असल्याने पाण्याला दुर्गंधी येत आहे, ही बाब जनतेच्या आरोग्यासाठी अत्यंत गंभीर असल्याचे नगरसेवक नितीन पन्नासे यांनी नमूद केले. समर्थ कॉलनीतील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी खासगी टँकर मागवावे लागतात किंवा ‘वॉटर कॅन’ विकत घ्यावे लागतात. तरीही नगर परिषद प्रशासनाला जाग येत नसल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. निवेदन देताना नगरसेवक नितीन पन्नासे यांच्यासह हर्षल चौधरी, नगरसेविका प्रीती ब्रह्मानंद देशमुख, जयश्री अजय आगरकर, प्रतिभा कैलास फंदे, मोनाली फंदे आणि इतर नागरिक उपस्थित होते. पाणीपुरवठा योजनेच्या कंत्राटदारावरही यावेळी ठपका ठेवण्यात आला. दलितेतर योजनेतून ६० लाख रुपयांची निविदा काढूनही कंत्राटदाराने कुशल कामगार न वापरल्याने पाणी वितरण व्यवस्था पूर्णपणे बिघडल्याचे निवेदनात म्हटले आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर