शहरात मंगळवार १६ रोजी दुपारी २ वाजताच्या सुमारास मान्सुनपूर्व वादळी पावसाने हजेरी लावली. सुरुवातीला वादळाचा जोर असला तरी नंतर मात्र तो ओसरला. सुमारे ३० मिनिटे तुरळक हलका ते मध्यम पाऊस झाला. शहरात आजवर सायंकाळी वादळी पाऊस हजेरी लावत होता. परंतु, आज प्रथमच दुपारी पाऊस आल्याने कामानिमित्त बाहेर असलेल्या नागरिकांची तारांबळ उडाली. काहींनी ऐनवेळी त्यांच्याकडे असलेल्या छत्र्या उघडून पावसापासून बचाव केला तर काहींनी रेनकोट घातले. गेल्या तीन दिवसांपासून सतत पाऊस हजेरी लावत असल्याने शहराच्या तापमानात दिलासादायक घट झाली असून कमाल तापमान २४ तासांत २.२ अंशाने कमी होऊन ३७.४ अंश सेल्सियसपर्यंत तर किमान तापमान १८.८ अंश सेल्सियसपर्यंत घसरले आहे. सध्या जिल्ह्यातत तुरळक ते विखुरलेल्या उर्वरित. पान ४ ^मान्सूनचा पाऊस सध्या फार संथगतीने प्रवास करीत आहे. गेल्या काही दिवसांपासून मान्सूनची उत्तर सीमा सिंधुदुर्ग (सरनई), सोलापूर, हैदराबाद अशी आहे. सध्या मान्सूनच्या पुढील प्रगती करीता परिस्थिती फारशी चांगली नाही. अरबी समुद्र किंवा बंगालच्या उपसागरात चक्राकार वारे किंवा कमी दाबाचे क्षेत्र अशी कोणतीही परिस्थिती नाही. त्यामुळे मान्सून वेगाने पुढे सरकत नाही. तरीही पुढील २-३ दिवसात तो महाराष्ट्राच्या आणखी काही भागात तो पोहोचण्याची शक्यता आहे. – प्रा अनिल बंड, हवामानतज्ज्ञ, श्री शिवाजी कृषी महाविद्यालय.
