ब्रेकिंग न्यूज
Eknath Shinde: सुप्रीम कोर्टात सुनावणी अन् एकनाथ शिंदे अचानक दिल्लीत! पीएम मोदींची घेणार भेट, बैठकीचं कारण … IND vs SL : श्रीलंका क्रिकेटचा टीम इंडियासोबत ‘गोलीगत धोका’! गंभीरच्या लगेच लक्षात आला शातीर डाव, शुभमनचाही… Chandrpur: हॉस्टेलमध्ये पाचवीमध्ये शिकणाऱ्या 2 भावांवर मित्रांकडून अनैसर्गिक अत्याचार, चंद्रपूर हादरलं महायुती सरकारची मोठी घोषणा, तब्बल 30209 जागांसाठी जम्बो शिक्षक भरती, असा करा अर्ज! मोबाईलवर तो मेसेज आला अन् तिथंच बिझनेसमन फसला, छ. संभाजीनगरात अडीच तासांचा थरार, शेवटी… पोलीस भरतीचं स्वप्न अधूरंच राहिलं, धावण्याचा सराव करताना खाली कोसळला अन् घेतला शेवटचा श्वास शफीकचं शतक, साजिदची घातक बॉलिंग, पाकिस्तानचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय, WTC टेबलही हललं! एल निनोच्या पार्श्वभूमीवर मारेगाव तालुक्यात शेततळ्यांची वाटचाल द्राक्षाने बुडवलं, डाळिंबाने केलं मालामाल! शेतात असं टेक्निक वापरून सोलापूरच्या शेतकऱ्याने कमावले 42 लाख! Solapur: माझे फॉलोअर्स का कमी केले? इन्स्टा रिल्सवरून बिनसलं, तरुणासोबत भयंकर…, ‘त्या’ दाव्याने पोलिसही च…
SP News Maregaon

‘उबाठा’ गट काँग्रेसमध्ये विलीन होण्याच्या वाटेवर; म्हणूनच खासदार दूर गेले:जनतेच्या न्यायालयात शिंदेंचीच शिवसेना खरी- नवनाथ बन

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


महाविकास आघाडीच्या अडीच वर्षांच्या सत्ताकाळात भाजपचा एकही आमदार त्यांच्या गळाला लागला नाही. त्यामुळे हा पैसा किंवा पदाचा संघर्ष नसून विचारांचा संघर्ष आहे.काँग्रेसमध्ये विलीन होण्याच्या दिशेने उबाठा गट वाटचाल करत असल्याने अनेक लोकांनी त्यांच्यापासून दूर जाण्याचा निर्णय घेतला आहे. खासदारांना टक्केवारी नव्हे तर जनतेच्या मतांची टक्केवारी महत्त्वाची वाटते, असे भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी म्हटले आहे. नवनाथ बन म्हणाले की, शिवसेना कुणाची याचा निर्णय महाराष्ट्रातील जनतेने आधीच दिलेला आहे. न्यायालयीन प्रक्रिया सुरू असली तरी जनतेच्या न्यायालयात मूळ शिवसेना ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील, हिंदुत्ववादी विचारांची शिवसेना असल्याचा कौल मतदारांनी दिला आहे. विधानसभा निवडणूक असो किंवा त्यानंतरच्या राजकीय घडामोडी, जनतेने दोनदा शिक्कामोर्तब केले आहे. त्यामुळे अमित शहा यांनी व्यक्त केलेल्या भूमिकेवरही जनतेने मतांच्या माध्यमातून शिक्का मारला असून संजय राऊत यांनी विनाकारण रडगाणं गाणं बंद करावं. राऊतांनी आत्मपरीक्षण करावे नवनाथ बन म्हणाले की, संजय राऊत आणि त्यांचा पक्ष रोज राहुल गांधी व काँग्रेसच्या सुरात सूर मिसळत आहे. हिंदुत्वाचा वारसा सोडून काँग्रेसच्या विचारसरणीसमोर नतमस्तक झालेल्यांनी भाजपला शिकवण्याचा प्रयत्न करू नये. अमित शहा हे हिंदुत्व आणि राष्ट्रहितासाठी काम करतात, तर उबाठा गट काँग्रेसच्या राजकारणाचा विस्तार बनला आहे. त्यामुळे इतरांवर टीका करण्याऐवजी संजय राऊत आणि त्यांच्या पक्षाने आत्मपरीक्षण करणे गरजेचे आहे. उबाठाचे वरातीमागून घोडे नवनाथ बन म्हणाले की, ज्या खासदारांना वेळ दिला नाही, ज्यांचे फोन घेतले नाहीत आणि ज्यांच्यासाठी मातोश्रीचे दरवाजे बंद होते, ते खासदार आता परत येणार नाहीत. वेळ निघून गेली असून खासदारांनी आपला निर्णय घेतला आहे. जेव्हा कार्यकर्ते, आमदार आणि खासदार भेटीसाठी विनंती करत होते तेव्हा त्यांना वेळ देण्यात आला नाही. आता राजकीय नुकसान झाल्यानंतर सुरू झालेले दौरे म्हणजे वरातीमागून घोडे असा प्रकार आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर