ब्रेकिंग न्यूज
Eknath Shinde: सुप्रीम कोर्टात सुनावणी अन् एकनाथ शिंदे अचानक दिल्लीत! पीएम मोदींची घेणार भेट, बैठकीचं कारण … IND vs SL : श्रीलंका क्रिकेटचा टीम इंडियासोबत ‘गोलीगत धोका’! गंभीरच्या लगेच लक्षात आला शातीर डाव, शुभमनचाही… Chandrpur: हॉस्टेलमध्ये पाचवीमध्ये शिकणाऱ्या 2 भावांवर मित्रांकडून अनैसर्गिक अत्याचार, चंद्रपूर हादरलं महायुती सरकारची मोठी घोषणा, तब्बल 30209 जागांसाठी जम्बो शिक्षक भरती, असा करा अर्ज! मोबाईलवर तो मेसेज आला अन् तिथंच बिझनेसमन फसला, छ. संभाजीनगरात अडीच तासांचा थरार, शेवटी… पोलीस भरतीचं स्वप्न अधूरंच राहिलं, धावण्याचा सराव करताना खाली कोसळला अन् घेतला शेवटचा श्वास शफीकचं शतक, साजिदची घातक बॉलिंग, पाकिस्तानचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय, WTC टेबलही हललं! एल निनोच्या पार्श्वभूमीवर मारेगाव तालुक्यात शेततळ्यांची वाटचाल द्राक्षाने बुडवलं, डाळिंबाने केलं मालामाल! शेतात असं टेक्निक वापरून सोलापूरच्या शेतकऱ्याने कमावले 42 लाख! Solapur: माझे फॉलोअर्स का कमी केले? इन्स्टा रिल्सवरून बिनसलं, तरुणासोबत भयंकर…, ‘त्या’ दाव्याने पोलिसही च…
SP News Maregaon

शेतरस्त्यांची दुरावस्था; पावसाळ्यात शेतकऱ्यांचे हाल:दुरूस्तीची मागणी, जिल्हा प्रशासन, बांधकाम विभागाचे दुर्लक्ष‎

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्र्यांना थेट ईमेल पाठवून आणि वृत्तपत्रांमधून सातत्याने आवाज उठवूनही अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातील उरळ बु. ते लोहारा येथील शेत रस्त्यांचा प्रश्न रेंगाळलेलाच आहे. मान्सून जूनच्या अखेरीस सक्रिय होण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. पाऊस सुरु झाल्यानंतर शेतकऱ्यांची रस्त्याअभावी गैरसोय होणार आहे. प्रशासनाने याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केल्याचा आरोप करीत शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. शेतकऱ्यांना शेतात ये-जा करण्यासाठी रस्त्याची समस्या भेडसावते. शेतकऱ्यांना शेतमाल, अवजारे, जनावरे, वाहने शेतात ने आण करणे सोईचे होत नाही. शेतरस्त्यांवरून वादही होतात. काही दिवसांपूर्वी जिल्ह्यातील शेतरस्ते अडथळामुक्त व्हावेत, यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत कालबद्ध कार्यक्रम निश्चित करून देण्यात आला होता. त्यानुसार कार्यवाही पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले होते. दरम्यान बाळापूर तालुक्यातील उरळ येथील शाभ घोडासकर यांनी केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण शिवराजसिंह चौहान यांना ई-मेल पाठवत शेतरस्त्याच्या दुरावस्था नमूद केली आहे, असे आझाद फाऊंडेशनचे अध्यक्ष गोपाल पोहरे यांचे म्हणणे आहे. मात्र त्यानंतरही हालचाली होतात दिसत नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. रस्त्याची समस्या तातडीने न सुटल्यास आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा पोहरे यांनी दिला आहे. प्रशासनाकडून आदेशाची पायमल्ली काही दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत जिल्ह्यातील शेत रस्ते अडथळामुक्त करण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम निश्चित करण्यात आला होता. मात्र, स्थानिक पातळीवर या आदेशाला केराची टोपली दाखवण्यात आली आहे. उरळ बु. येथील शेतकरी श्याम घोडस्कार, आझाद फाउंडेशनचे अध्यक्ष गोपाल पोहरे यांनी थेट केंद्रीय पातळीवर दाद मागूनही यंत्रणा हलण्यास तयार नाही, असा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. शेत रस्त्यांच्या दुरावस्थेमुळे कृषी उत्पादकतेला धोका निर्माण झाल्याचे शेतकऱ्यांनी केंद्रीय मंत्र्यांना पाठलेल्या ई-मेलमध्ये नमूद केले आहे. अकोला जिल्ह्यातील उरळ ख. ते लोहारा या शेतरस्त्याची अत्यंत दुरावस्था झाली आहे. हा रस्ता या भागातील शेतकऱ्यांसाठी अत्यावश्यक आहे. मात्र गत अनेक वर्षांपासून रस्त्याची दुरावस्था झाली आहे. जीव, उपजीविका आणि कृषी उत्पादकतेला गंभीर धोका निर्माण करत आहे. रस्त्याला खोल खड्डे पडले आहेत. पावसाळ्यात तर जवळजवळ चालणेही अशक्य होते. अनेक ठिकाणी चिखलाचे साम्राज्य निर्माण होते.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर