ब्रेकिंग न्यूज
10 सेकंदांचा थरार! लिफ्टमध्ये वर जाताना अचानक बसले भूकंपाचे धक्के, नाशिकमधील घटना CCTV कॅमेऱ्यात कैद CRIME : गँगवॉरने नांदेड हादरलं! दोघं दबा धरून बसले, गाडी पेट्रोल पंपावर वळली अन् सांडला रक्ताचा सडा; इंद्रज… Ravindra Jadeja : ड्रेसिंग रूमममध्ये रविंद्र जडेजाने असं काय केलं की, गंभीर खळखळून हसला; Video आला समोर मारेगावच्या हेमंतची UPSC-CAPF मध्ये दमदार भरारी! Success Story : नोकरीच्या मागे न लागता घेतला व्यवसायाचा निर्णय, बंदिस्त शेळीपालन केलं यशस्वी, वर्षाला 7 लाख… पश्चिम बंगालच्या उपसागरात घोंगावतंय मोठं संकट, विदर्भ-मध्य महाराष्ट्रात अतिवृष्टीचा अलर्ट, हवामान विभागाने … CRIME : बालपणापासून जिवाभावाच्या मैत्रिणी अन् एकत्र मृत्यूला कवटाळलं! नातेवाईकांकडे दुपारी जेवण अन् 4 तासात… Eknath Shinde: सुप्रीम कोर्टात सुनावणी अन् एकनाथ शिंदे अचानक दिल्लीत! पीएम मोदींची घेणार भेट, बैठकीचं कारण … IND vs SL : श्रीलंका क्रिकेटचा टीम इंडियासोबत ‘गोलीगत धोका’! गंभीरच्या लगेच लक्षात आला शातीर डाव, शुभमनचाही… Chandrpur: हॉस्टेलमध्ये पाचवीमध्ये शिकणाऱ्या 2 भावांवर मित्रांकडून अनैसर्गिक अत्याचार, चंद्रपूर हादरलं
SP News Maregaon

जवळगाव प्रकल्पातील वृक्षतोडीची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी:मुख्यमंत्री, लाचलूचपत विभागाकडे नागेश चव्हाण यांची मागणी‎

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


बार्शी तालुक्यातील जवळगाव मध्यम प्रकल्प परिसरात चंदन, चिंच, लिंब, बाभूळ, कडुलिंब तसेच विविध औषधी व दुर्मिळ वृक्षांची मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर वृक्षतोड करून शासनाच्या वनसंपदेचा अपहार करण्यात आल्याचा गंभीर आरोप करत जवळगाव येथील नागेश चव्हाण यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मुख्य सचिव, जलसंपदा, वन व महसूल विभागासह लाचलुचपत प्रतिबंधक विभाग आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली आहे. तक्रारीनुसार, जवळगाव मध्यम प्रकल्प परिसरात अनेक दशकांपासून अस्तित्वात असलेली चंदन, चिंच, लिंब, बाभूळ, वड, पिंपळ यासारखी शेकडो मौल्यवान झाडे तसेच विविध औषधी वनस्पतींची मोठ्या प्रमाणावर तोड केली आहे. यातील अनेक वृक्ष ७० ते ८० वर्षांहून अधिक जुने असून, पर्यावरणीय, जैवविविधता व व्यापारीदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे होते. विशेषतः चंदनासारख्या लाखो रुपयांचे बाजारमूल्य असलेल्या वृक्षांची नियोजनबद्ध पद्धतीने व संगनमताने तोड करण्यात आल्याचा संशय तक्रारीत व्यक्त करण्यात आला आहे. संबंधित वृक्ष धरण, कालवा किंवा प्रकल्पाच्या इतर कोणत्याही घटकास अडथळा निर्माण करत नसतानाही त्यांची तोड केल्याचा दावा केला आहे. तसेच कोणतीही वैध प्रशासकीय मंजुरी, वन विभागाची पूर्वपरवानगी, पंचनामा, मूल्यांकन अहवाल किंवा कायदेशीर लिलाव प्रक्रिया न करता वृक्षतोड केल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणात काही लाकूड व्यापारी, कंत्राटदार तसेच संबंधित विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांच ्या संगनमतातून वनसंपदेची अवैध विक्री करून शासनाच्या मालमत्तेचा अपहार झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. १५ वर्षांतील परवाने शोधावेत या प्रकरणाची उच्चस्तरीय व स्वतंत्र चौकशी करण्यासाठी वन, महसूल, जलसंपदा आणि पोलिस विभागाचे एसआयटी नियुक्त करावी, मागील १५ वर्षांतील सर्व वृक्षतोड परवानग्या, पंचनामे, वाहतूक परवाने, लिलाव नोंदी आणि आर्थिक व्यवहारांची तपासणी करावी, दोषी अधिकारी, कर्मचारी, व्यापारी, कंत्राटदारांवर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी तक्रारदार नागेश चव्हाण यांनी केली आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर