ब्रेकिंग न्यूज
उभ्या ट्रकला दुचाकीची मागून जोरदार धडक; तरुण गंभीर जखमी मारेगावच्या वारंवार वीजखंडितीविरोधात नागरिक आक्रमक; सात दिवसांचा अल्टिमेटम Konkan Railway: कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी गुड न्यूज, विशेष रेल्वेला अतिरिक्त थांबे, पण कुठे? पतीच्या व्हॉट्सॲपवरून नंबर घेतला, त्याला अडचण सांगितली, 26 वर्षांच्या विवाहितेला ‘ती’ चूक भोवली, छ. संभाजी… FDA News | अन्नाच्या नावाखाली काळा धंदा! FDA कडून पर्दाफाश | Tukaram Mundhe News | Special Report Satish Maratha Murder : ‘प्रत्येक चौकात मीच टिकणार…’, सतीश मराठावर 39 सपासप वार करण्याआधी राहुलचा शेवटचा … Lumpy Skin Disease : जनावराला ताप अन् शरीरावर सूज, असू शकतो लम्पी आजाराचा धोका, अशी घ्या काळजी Video पुणेकर वाहतूक कोंडीचं टेन्शन सोडा! पाषाण ते कोथरूड अवघ्या 10 मिनिटांत, नेमका प्लॅन काय? ‘ओम नम: शिवाय’चा जप करत पोरानं मैदानात घातला तांडव! मॅच जिंकून दिली, कोण आहे वंश बेदी? पाहा Video Raj Thackeray News | तिसरी मुंबई कुणासाठी? राज ठाकरेंचा सवाल! | Special Report
SP News Maregaon

पांगरीत खरीप हंगामातील पेरण्या पूर्णपणे रखडल्या:शेतकरी चिंतेत, बियाणे, खते खरेदी करूनही शेतकरी चिंतेत; जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर‎

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


पांगरी (ता. बार्शी) या भागात जून महिना संपत आला तरी समाधानकारक पाऊस न झाल्याने खरीप हंगामातील पेरण्या रखडल्या आहेत. शेतकऱ्यांनी बी-बियाणे व खतांची खरेदी करून ठेवली असली तरी पुरेसा ओलावा नसल्याने पेरणीला सुरुवात करता आलेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांसह पशुपालकांमध्येही चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी शेत मशागतीची कामे पूर्ण करून खरीप हंगामासाठी तयारी केली आहे. मात्र गेल्या तीन आठवड्यांपासून समाधानकारक पाऊस न झाल्याने सोयाबीन, तूर, मूग, उडीद व मका आदी पिकांच्या पेरण्या खोळंबल्या आहेत. पाऊस लांबल्यास खरीप हंगामाचे नियोजन विस्कळीत होण्याची भीती व्यक्त होत आहे. पावसाअभावी केवळ पेरण्याच नव्हे तर पशुधनासमोरील चाऱ्याचाही प्रश्न गंभीर बनण्याची शक्यता आहे. या भागातील ग्रामीण भागात सध्या शेतकरी आकाशाकडे डोळे लावून बसले असून लवकर पाऊस पडावा, अशी आस धरून शेतकरी बसला आहे. येत्या काही दिवसांत चांगला पाऊस झाला नाही तर पशुपालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागू शकतो. दरम्यान, कृषी विभागाने शेतकऱ्यांना घाईघाईने पेरणी न करण्याचा सल्ला दिला आहे. जमिनीत पुरेसा ओलावा निर्माण झाल्यानंतरच पेरणी करावी. ^बाजारपेठेतून खते व बियाणे आणून ठेवले असले तरी पावसाअभावी खरीप पेरण्या रखडल्या आहेत. आणखी १५ दिवस समाधानकारक पाऊस झाला नाही तर पशुपालकांसमोर मोठे संकट उभे राहील. जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनेल. चारा उपलब्ध न झाल्यास काही पशुपालकांवर जनावरे विकण्याची वेळ येईल. — प्रमोद माळी, शेतकरी व पशुपालक, पांगरी ^खरीप पेरणीसाठी जमिनीत पुरेसा ओलावा निर्माण होणे आवश्यक आहे. किमान ९० ते १०० मिमी पाऊस झाल्यानंतरच शेतकऱ्यांनी पेरणी करावी. अपुऱ्या पावसावर पेरणी केल्यास उगवण व पिकांच्या वाढीवर विपरीत परिणाम होऊ शकतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी घाई न करता पुरेशा पावसाची प्रतीक्षा करावी. — सुधीर काशीद, मंडळ कृषी अधिकारी, पांगरी.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर