ब्रेकिंग न्यूज
Maratha OBC Reservation: मराठा आरक्षणाचा वाद पुन्हा पेटणार? जरांगेंच्या आक्रमकतेला उत्तर देण्यासाठी OBC सम… India Vs Sri Lanka : ‘सरफराज खानला क्लियारिटी द्या…’, गंभीरला झापलं! मुंबईकर खेळाडूसाठी मैदानात उतरला 765… Chandrapur : खेळता खेळता बाळाने ट्यूबचं टोपण गिळलं,कुटुंबियांच्या काळजाचा ठोका चुकला, पुढे काय घडलं? उभ्या ट्रकला दुचाकीची मागून जोरदार धडक; तरुण गंभीर जखमी मारेगावच्या वारंवार वीजखंडितीविरोधात नागरिक आक्रमक; सात दिवसांचा अल्टिमेटम Kolhapur: चारित्र्याचा संशय, गाडीवरून जातानाच बिनसलं, पतीनं…, भरदिवसा कोल्हापूरच्या रस्त्यावर थरार Konkan Railway: कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी गुड न्यूज, विशेष रेल्वेला अतिरिक्त थांबे, पण कुठे? पतीच्या व्हॉट्सॲपवरून नंबर घेतला, त्याला अडचण सांगितली, 26 वर्षांच्या विवाहितेला ‘ती’ चूक भोवली, छ. संभाजी… FDA News | अन्नाच्या नावाखाली काळा धंदा! FDA कडून पर्दाफाश | Tukaram Mundhe News | Special Report Satish Maratha Murder : ‘प्रत्येक चौकात मीच टिकणार…’, सतीश मराठावर 39 सपासप वार करण्याआधी राहुलचा शेवटचा …
SP News Maregaon

चिमणपुरी पिंपळे येथे विद्युत रोहित्र, वीज तारांची दुरवस्था:डीपीलगत तार तुटल्याने शेतकऱ्यांचा जीव धाेक्यात; पेरणीलाही अडचण‎

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


अमळनेर तालुक्यात पिंपळे परिसरात खरीप हंगामाची लगबग सुरू असून शेतकरी पेरणीच्या कामात व्यस्त आहेत. मात्र, येथील शेतकरी भीमराव नारायण पाटील यांच्या शेतालगत असलेल्या विद्युत रोहित्राची (डीपी) प्रचंड दुरावस्था झाली आहे. गेल्या तीन दिवसांपासून या “डीपी’लगतची वीजतार तुटून पडलेली असल्याने शेतकऱ्यांच्या पेरणीच्या कामात मोठा अडथळा निर्माण झाला आहे. या रोहित्राला संरक्षणासाठी लोखंडी पेटी किंवा फेन्सिंगची कोणतीही व्यवस्था नाही. खरीप हंगामामुळे सध्या शेतात ट्रॅक्टर, मजूर आणि शेतकऱ्यांची मोठी वर्दळ असते. अशा परिस्थितीत उघडे रोहित्र आणि जमिनीवर पडलेली वीज तार यामुळे शेतकरी व जनावरांच्या जीवाला मोठा धोका निर्माण झाला असून, हा प्रकार एखाद्या मोठ्या अपघाताला निमंत्रण देणारा ठरत आहे. महावितरणच्या संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना वारंवार फोन करूनही त्यांनी अद्याप याकडे पाठ फिरवली असल्याचा संतप्त आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. विशेष म्हणजे, महावितरणच्या अशाच निष्काळजीपणामुळे मागील रब्बी हंगामात याच परिसरातील गव्हाच्या पिकाला आग लागून मोठे नुकसान झाले होते. या जुन्या घटनेतून ही प्रशासनाने कोणताही धडा घेतलेला दिसत नाही. “मागच्या हंगामात पीक जळाले, आता खरीप पेरणी अडली; महावितरणने आणखी किती नुकसान झाल्यावर जागे व्हायचे?” असा संतप्त सवाल शेतकरी उपस्थित करत आहेत.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर