#वाघाच्या दशहतीतही करावी लागते जागली..
# शेतक-यांना वनविभाकडून मिळणाऱ्या झटका मशिन कधी मिळणार….
तालुका प्रतिनीधी :-झरी (जामणी) ज्ञानेश्वर आवारी
( 88059 79173)
सविस्तर वृत्त असे की…
झरी:-तालुक्यात अल्य व अत्यल्प शेतकरी जास्त प्रमाणात असून कोरडा तर कधी ओला दुष्काळ सतत नापिकी अस्मानी व सुलतानी संकटात सापडला आहे . जंगली भाग रानटी जनावरे संपूर्ण पिक फस्त करत आहे. लावलेला खर्च निघत नाही . कुंटुबाचा खर्च आरोग्य, मुला बाळांचे शिक्षण बँकेचे कर्ज भरण कठीण होत चालले आहे .
मुकुटबन व झरी असे दोन वन विभाग असून सुमारे दोन हजार हेक्टर जंगल क्षेत्र आहे .या जंगलात वाघ , लांडगा कोल्हा या हिस्त्र प्राण्या बरोबर रोही रानडुक्कर मोठ्या प्रमाणात आहे .डोंगरगाव, चिंचघाट पवनार , आडकोली , मांडवा , वडगाव , जुनोनी ,पाचपोर, बंदी बाढोणा ,शेकापूर ,खापरी ,इत्यादी जंगलालगतच्या शिवारातील शेतीचे विशेषत: रोही व रानडुक्कर पेरणी पासूनच तर काढणी पर्यत सर्वात जास्त नुकसान करतात .या परिसरातील लोकांना वाघाची दहशत असतांना पावसाळ्यात ,थंडीत रात्र दिवस पिकांची राखण करावी लागत आहे
. प्राण्याचा बंदोबस्तासाठी या भागातील शेतकऱ्यांनी जंगलाला जाळीचे कुपन करण्याची मागणी अनेकदा शेतकऱ्यांनी वन विभागाकडे केली आहे .
जंगला जवळील शेतीचे नुकसान टाळण्यासाठी उपयोजना म्हणून वनविभागाकडून शेतकऱ्यांना ‘ झटका मशिन ‘ ५० % रक्कम घेऊन ही माशिन देण्यात येतात . पिकाच्या सभोवताल बारीक तार लावून त्यातून बॅटरी मशिनीतून प्रवाह चालू करण्यात येतो . त्या तारेला स्पर्श होताच प्राण्याला विदूत प्रमाणे बॅटरीचा झटका लागतो त्यामुळे प्राणी शेतात प्रवेश करत नाही . याने वन्य प्राण्यांना इजा पण होत नाही व पिकांचे रक्षण होते .
परंतु मुकूटबन वन विभागाने मात्र पवनार येथील केवळ १० शेतकऱ्यांना या माशिनचे वाटप करण्यात आले आहे . बरेच शेतकरी प्रतीक्षेत असून कृती आराखडा तयार केल्या नंतरच उर्वरीत शेतकऱ्यांना लाभ मिळणार असाल्याचे सांगण्यात आले आहे .
एकही पिक जंगली जनावरांच्या तावडीतून सुटत नाही आता तुरीचे पिक निघाले आहेत परंतु चना काढणीस तयार झाला असुन वाळलेल्या चण्यावर रान डुकराचा जास्त जोर आहे.हाता तोंडाशी आलेले पिक एका रातून उद्वस्त करत आहे . वन विभागाने या प्राण्यांचा बंदोबस्त करण्याची वारंवार मागणी केली जात असतांना मात्र वन विभाग शेतकऱ्यांच्या मागणी कडे फार गांभीर्याने लक्ष देत नसल्याचे दिसून येते…
