Shopping Cart
Total:

$0.00

Items:

0

Your cart is empty
Keep Shopping

कोणी नाही कुणाचे शेवटी अंती जाणे रे ऐकल्याचे !!!!!!

गेल्या 2 वर्षात मारेगाव तालुक्यात 106 आत्महत्या.

त्यामधून 26 मदतीस पात्र 59 शेतकऱ्यांनी संपवली आपली जिवन यात्रा…

मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई
[9922862184]

सविस्तर वृत्त असे की..
मारेगाव तालुक्यातील गेल्या दोन वर्षांपासून सतत पंधरवाड्याला ,महिन्याला विविध कारणाने आत्महत्येचे प्रकरण समोर येत आहे. सन 2020 या वर्षी पासून तर 2022 या चालू वर्षा सुमारे 106 तालुक्यात आत्महत्या झाल्या आहे. यात 59 शेतकरी आत्महत्या आहेत यातील फक्त 26 आत्महत्या पात्र ठरले आहे.
जागतिक कोरोणानाच्या महामारीमुळे रोजगार, शेती, व्यवसाय, शासकीय कामकाज, शिक्षण प्रभावित झाले होते.
आजही जनमानसात कोरोनाची भिती कायम असल्याचे वास्तव आहे. तालुक्यात मागील 2 वर्षात कदाचित नैराश्यातून आत्महत्या केल्याने अनेकांना आपले प्राण गमवले आहे सातत्याने होणाऱ्या या आत्महत्येने समाजमन सुन्न होत असून मारेगाव तालुका आता आत्महत्याग्रस्त तालुका म्हणुन नावारूपाला येत आहे. आत्महत्येचे कालचक्र कधी संपणार ? असा प्रश्न जनतेला पडत आहे. सातत्याने होणाऱ्या आत्महत्यामुळे
समाजमन सुन्न झाले आहे नैराश्यातून आत्महतेकडे प्रामुख्याने तरुण पिढी ओढल्या जात आहे समाजातील नागरिकांचे नैराश्य दुर करण्यासाठी शासन लाखो रुपये खर्च करून जनजागृती करीत आहे. परंतू जन जागृतीचा काहीच परीणाम होत नसल्याचे चित्र आहे.

मागील 2 वर्षाच्या काळात 106 आत्महत्या झालेल्या आहे. आत्महत्येचे हेत सत्र 2022 मध्ये पण सुरूच आहे. मागील 2 महिन्यात विविध कारणाने 8 लोकांनी हत्महत्या केल्या आहे. यात सन 2020 मध्ये 46 व 2021 मध्ये 52 आणी चालू वर्षात जानेवारी मध्ये 2 व फेब्रुवारी मध्ये 5 मार्च महिन्याच्या सुरुवातीला 1 आत्महत्या झाली आहे. मारेगांव तालुक्यात वाढत्या शेतकरी आत्महत्यांमुळे समाजमन चिंतीत झाले आहे. या तालुक्यात केवळ शेतकरीच नाही तर बेरोजगार तरुणही निराशेच्या गर्तेत सापडले असून जिवन यात्रा संपवित आहे. या तालुक्यात रोजगाराची सुविधा नसणे हे देखील आत्महत्येचे एक कारण ठरत असल्याचेच जनतेतून बोलल्या जात आहे.

[ ] मागिल 2 वर्षाच्या काळात आत्महत्येचा 100 आकडा पार झाला आहे. यातील 2 फेर चौकशीत आहे 2 वर्षात एकूण 59 आत्महत्या झाल्या असल्या तरी दोन वर्षात केवळ 26 शेतकरी मदतीस पात्र ठरले आहे उर्वरित आत्महत्या लाभास अपात्र ठरल्याने या आत्महत्याग्रस्त कुटुंबियांना शासनाचा कोणताही लाभ मिळाला नाही. उध्ववस्त झालेले संसार नव्याने थाटण्यासाठी सरकारी स्तरावर उपाययोजना करणे अत्यंत गरजेचे आहे अशी तालुक्यातील जनतेचे आर्त हाक आहे…

Read Also:
0
Show Comments (0) Hide Comments (0)
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest
0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
Recent Posts:
error: Content is protected !!