<<>>शासनाने घरकुल अनुदानात वाढ करावी अशी लाभार्थ्यांची शासनाला आर्त हाक<<>
मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई
[9922862184]
सविस्तर वृत्त असे की..
यवतमाळ जिल्हातील मारेगाव तालुका हा आदिवासी बहुल तालुका म्हणून ओळखल्या जातो. या तालुक्यातील बहुतांश कुटुंबे ही फक्त रोजमजुरीवर आपल्या कुटुंबाची उपजीविका भागून आपले जिवन जगत असल्याचे दिसतात. त्यांना राहण्यासाठी साधे घर सुध्दा नाहीत. म्हणून शासनाने प्रत्येकाला हक्काचे घर मिळावेत या करीता तालुक्यातील गावा गावात सर्व्हे करून प्रत्येक ग्रामपंचायत मध्ये ग्रामसभा घेवून खरे गरजू कुटुंबाची यादी तयार करण्यात आली होती. तेव्हां पासून आज पर्यन्त घरकुलची अपेक्षा करीत असणाऱ्यांना काही प्रमाणात प्रत्येक ग्रामपंचायतला पात्र निवड लाभार्थ्यांची यादी येवुन त्यांचे कागदपत्रे जमा करून त्या पात्र लाभार्थ्यांना घरकूलचा लाभ मिळणार आहेत.
ह्या घरूकूल लाभार्थ्यांना फक्त 1,20,000 रुपये एवढेच अनुदान मिळणार असल्याने एवढ्या कमी अनुदानात घरकुल पूर्ण करायचे कसे अशी चिंता वाटायला लागल्याची चर्चा आता सर्वत्र सुरू झाली आहेत.करण असे आहेत की आता रेती,सिमेंट, सलाख, वीटा,व लागणाऱ्या इतरही साहित्याच्या किमतीत खूब मोठ्या प्रमाणात वाढली झाली आहे . याभाव वाढली मुळे घरकुल पात्र लाभार्थ्यांमध्ये चिता वाढल्याचे दिसून येत आहेत. त्यातच घरकुल बांधकाम करणाऱ्या कारागीर-मजुरांचे भाव (मजुरी) सुद्दा खूब महागडी झाल्याणे हा शासनाकडून मिळणारे अल्पसे अनुदान यात खरच आम्हचे घरकुल पूर्ण करतील काय? की “घर उकलून मांडव टाकल्या गत ” परस्थिती तर आम्हाच्या वर येणार तर नाहीत.यांची चिंता सर्वच घरकुल लाभार्थ्यांना लागल्याचे चित्र दिसून येत आहेत.
यवढि भयावह महागाई वाढली ही आम्हच्या शासनाला अजूनही माहीत नसेल काय? या महागाई व अल्पशा अनुदानात खरच आम्हचे घरकुल पूर्ण होतील काय? नाहीतर घर पाडून बेघर होवून उघड्यावर कुटुंबे घेवून राहण्याचीच वेळ येइल काय? असे अनेक प्रश्न आज रोजी घरकुल पात्र लाभार्थ्यांना पडले आहेत.
शासनाने सर्व महागाईचा विचार करून खरच गोरगरिबांना हक्काचे घर पूर्ण होईल, कोणाचेही महागाई मुळे घरकुल अपूर्ण रहाणार नाहीत.या करीता महागाई चा सखोल अभ्यास करून घरकुल अनुदानात वाढ करावीत. नाहीतर सर्व तालुक्यात शासनाला कोणत्याही लाभार्थ्यांचे घर पूर्ण झाल्याचे चित्र दिसणारच नाहीत. या करीता घरकुल लाभार्थी शासनास आर्त हाक देतानी दिसतात….
