ब्रेकिंग न्यूज
Raj Thackeray News | तिसरी मुंबई कुणासाठी? राज ठाकरेंचा सवाल! | Special Report पत्नी अन् लेकरांना सोडून पोटाची खळगी भरण्यासाठी गाठलं महाराष्ट्र; पण कामावर जाताच संदीपसोबत भयंकर घडलं PM Kisan Samman Nidhi : शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! ‘या’ एका चुकीमुळे थांबणार पीएम-किसानचे ६,००० रुपये! 10 सेकंदांचा थरार! लिफ्टमध्ये वर जाताना अचानक बसले भूकंपाचे धक्के, नाशिकमधील घटना CCTV कॅमेऱ्यात कैद CRIME : गँगवॉरने नांदेड हादरलं! दोघं दबा धरून बसले, गाडी पेट्रोल पंपावर वळली अन् सांडला रक्ताचा सडा; इंद्रज… Ravindra Jadeja : ड्रेसिंग रूमममध्ये रविंद्र जडेजाने असं काय केलं की, गंभीर खळखळून हसला; Video आला समोर मारेगावच्या हेमंतची UPSC-CAPF मध्ये दमदार भरारी! Success Story : नोकरीच्या मागे न लागता घेतला व्यवसायाचा निर्णय, बंदिस्त शेळीपालन केलं यशस्वी, वर्षाला 7 लाख… पश्चिम बंगालच्या उपसागरात घोंगावतंय मोठं संकट, विदर्भ-मध्य महाराष्ट्रात अतिवृष्टीचा अलर्ट, हवामान विभागाने … CRIME : बालपणापासून जिवाभावाच्या मैत्रिणी अन् एकत्र मृत्यूला कवटाळलं! नातेवाईकांकडे दुपारी जेवण अन् 4 तासात…
SP News Maregaon

रस्त्यासाठी जमिनी देणारे
शेतकरी अखेर  बसले उपोषणाला

76 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

20 वर्षांपासून मोबदल्याची प्रतीक्षेत

तालुका प्रतिनीधी :-झरी (जामणी) ज्ञानेश्वर आवारी
   [88059 79173]

झरी जामणी:– आपल्या परिसराचा विकास व्हावा ही अपेक्षा ठेवून शेतकऱ्यांनी रस्त्याच्या कामासाठी आपल्या जमिनी दिल्या. मात्र प्रशासनाच्या उदासीन कारभारामुळे तब्बल 20 वर्षांपासून या शेतकऱ्यांना जमिनीचा मोबदलाच मिळाला नाही. त्यामुळे रस्त्यासाठी त्याग नाही. करणाऱ्यांच्या जगण्याचा मार्ग खडतर बनला आहे. अशा हतबल शेतकऱ्यांनी शेवटी मंगळवारपासून यवतमाळात बेमुदत उपोषण सुरू केले आहे.

झरी-पांढरकवडा परिसरातील सुर्ला, गोधणी परिसरातील हे शेतकरी आझाद मैदानात उपोषणाला बसले आहेत. या शेतकऱ्यांनी 2003 मध्ये सुर्ला- गोधणी या रस्त्यासाठी आपल्या जमिनी शासनाला दिल्या. यात 27 शेतकरी बाधीत झाले आहेत. परंतु, शासन नियमानुसार त्यांना आजपर्यंत जमिनीच्या मोबदल्याचे पैसे मिळालेले नाही. या शेतकऱ्यांनी पांढरकवडा एसडीओंकडे वारंवार हेलपाटे मारूनही त्यांना न्याय मिळाला नाही.

शेवटी जिल्हाधिकाऱ्यांनीच यात तोडगा काढावा, अशी अपेक्षा घेऊन या शेतकऱ्यांनी यवतमाळ गाठले. आझाद मैदानात शेतकऱ्यांनी उपोषण सुरू केले आहे. गेल्या 20 वर्षांच्या काळात जमिनी नसल्याने शेतकऱ्यांचे हाल सुरू आहेत. किमान जमिनीचा मोबदला मिळाला असता तर इतर ठिकाणी जमीन घेवून शेती करता आली असती.

किंवा अन्य व्यवसाय तरी करता आला असता. परंतु, प्रशासनाने त्यांच्या मोबदल्याबाबत उदासीन धोरण अवलंबले आहे. त्यातून काळजीपोटी काही शेतकऱ्यांचा मृत्यूही झाला आहे. आता जिल्हाधिकाऱ्यांनी यात हस्तक्षेप करून तातडीने मोबदला मिळवून द्यावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. रंजित तोडासे, मधुकर पवारकर, बबन पाचभाई, मारोती धोबे, जगन पाचभाई, शंकर मंडाळी, दशरथ मेश्राम, मधुकर काकडे, शंकर कोडापे, विलास गोरे, नामदेव मंडाळी, गयाबाई कोडापे, मिराबाई धोबे, जनार्धन धोबे, घागरू मंडाळी आदी शेतकरी उपोषणाला बसले आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर