मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई
[9922862184]
मारेगाव तालुक्यातील :- बुरांडा ते खापरी रस्त्याच्या कामाला पंधरा वर्षानंतर सुरुवात झाली आणि 2.5 की.मी पैकी फक्त 2 कि.मी चे डांबरीकरणाचे काम करण्यात आले आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने उर्वरीत अर्धा कि.मी रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले आहे.

खापरी येथे जाण्याकरिता एकमेव मार्ग असुन पाऊसा मुळे ह्या रस्तावर चिखल व साचलेल्या पाण्यामुळे अखेरची घटका मोजत आहे. रस्त्याची अवस्था एवढी बिकट आहे. की वाहन तर दुरच राहीले पण पायदळ चालणे सुद्धा कठीण होऊन बसले आहे.हा रस्ता जिल्हा परिषद अंतर्गत येत असुन खापरी ते बुरांडा हा रस्ता पंधरा वर्षांनंतर तयार झाला आहेत. पण तो ही केवळ 2.5 पैकी 2 कि.मी रस्त्याचे डांबरीकरणाचे काम करण्यात आले आहे.
हे काम गेल्या मे 2022 या महिन्यात करण्यात आले आहे पण उर्वरीत अर्धा कि.मी रस्ता पूर्णताहा उखडून खड्डे व चिखलमय झालेला आहे. तालुक्यामध्ये सध्या सततच्या पावसाने जोरदार हजेरी लावली आहे.या रस्त्याने चिखलातून व पाण्यातुन पायदळ चालने सुद्धा कठीण झाले आहे.उर्वरीत अर्धा कि.मी हा रस्ता जिल्हा परीषद अंतर्गत येत असुन सबंधित अधिकाऱ्यांना गावकऱ्यांनी विचारणा केली असता तुमचा रोड जिल्हा परीषद मधुन मंजुरी करिता पाठवला आहे.आणि सरकार बदल्यामुळे तो रद्ध करण्यात आला आहे. अशी माहिती देण्यात आली आहे.

प्रतिक्रिया.
गेल्या पंधरा वर्षापासून खापरी रस्ता दुर्लक्षित होता पण गेल्या मे 2022 या महिन्यात 2.5 की.मी. पैकी 2 की.मी. रस्त्याचे डांबीकरणाचे काम जिल्हा परिषद मार्फत करण्यात आले आहे. पण उर्वरित अर्धा कि.मी या रस्त्याने पावसाळ्यात पायदळ चालणे सुद्धा कठीण बाब झाली आहे.उखळलेल्या रस्त्यातून चिखल व साचलेल्या पाण्याचा तून दुचाकी तर सोडा पण साधे पायदळ चालणे कठीण झाले आहे. एखाद्याचे आरोग्य बिघडल्यास येथुन तालुक्याच्या ठिकाणी त्याला नेण्यास मोठी कसरत करावी लागत आहे.आणि बाहेरगावी शाळेत ये- जा करणाऱ्या शाळकरी विद्यार्थ्यांना व नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. या गंभीर बाबीची त्वरीत दखल घेण्यात यावी अशी गावकऱ्यांची मागणी आहे.
