ब्रेकिंग न्यूज
Raj Thackeray News | तिसरी मुंबई कुणासाठी? राज ठाकरेंचा सवाल! | Special Report पत्नी अन् लेकरांना सोडून पोटाची खळगी भरण्यासाठी गाठलं महाराष्ट्र; पण कामावर जाताच संदीपसोबत भयंकर घडलं PM Kisan Samman Nidhi : शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! ‘या’ एका चुकीमुळे थांबणार पीएम-किसानचे ६,००० रुपये! 10 सेकंदांचा थरार! लिफ्टमध्ये वर जाताना अचानक बसले भूकंपाचे धक्के, नाशिकमधील घटना CCTV कॅमेऱ्यात कैद CRIME : गँगवॉरने नांदेड हादरलं! दोघं दबा धरून बसले, गाडी पेट्रोल पंपावर वळली अन् सांडला रक्ताचा सडा; इंद्रज… Ravindra Jadeja : ड्रेसिंग रूमममध्ये रविंद्र जडेजाने असं काय केलं की, गंभीर खळखळून हसला; Video आला समोर मारेगावच्या हेमंतची UPSC-CAPF मध्ये दमदार भरारी! Success Story : नोकरीच्या मागे न लागता घेतला व्यवसायाचा निर्णय, बंदिस्त शेळीपालन केलं यशस्वी, वर्षाला 7 लाख… पश्चिम बंगालच्या उपसागरात घोंगावतंय मोठं संकट, विदर्भ-मध्य महाराष्ट्रात अतिवृष्टीचा अलर्ट, हवामान विभागाने … CRIME : बालपणापासून जिवाभावाच्या मैत्रिणी अन् एकत्र मृत्यूला कवटाळलं! नातेवाईकांकडे दुपारी जेवण अन् 4 तासात…
SP News Maregaon

बुरांडा ते खापरी रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य.

73 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई
[9922862184]

मारेगाव तालुक्यातील :- बुरांडा ते खापरी रस्त्याच्या कामाला पंधरा वर्षानंतर सुरुवात झाली आणि 2.5 की.मी पैकी फक्त 2 कि.मी चे डांबरीकरणाचे काम करण्यात आले आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने उर्वरीत अर्धा कि.मी रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले आहे.

खापरी येथे जाण्याकरिता एकमेव मार्ग असुन पाऊसा मुळे ह्या रस्तावर चिखल व साचलेल्या पाण्यामुळे अखेरची घटका मोजत आहे. रस्त्याची अवस्था एवढी बिकट आहे. की वाहन तर दुरच राहीले पण पायदळ चालणे सुद्धा कठीण होऊन बसले आहे.हा रस्ता जिल्हा परिषद अंतर्गत येत असुन खापरी ते बुरांडा हा रस्ता पंधरा वर्षांनंतर तयार झाला आहेत. पण तो ही केवळ 2.5 पैकी 2 कि.मी रस्त्याचे डांबरीकरणाचे काम करण्यात आले आहे.

हे काम गेल्या मे 2022 या महिन्यात करण्यात आले आहे पण उर्वरीत अर्धा कि.मी रस्ता पूर्णताहा उखडून खड्डे व चिखलमय झालेला आहे. तालुक्यामध्ये सध्या सततच्या पावसाने जोरदार हजेरी लावली आहे.या रस्त्याने चिखलातून व पाण्यातुन पायदळ चालने सुद्धा कठीण झाले आहे.उर्वरीत अर्धा कि.मी हा रस्ता जिल्हा परीषद अंतर्गत येत असुन सबंधित अधिकाऱ्यांना गावकऱ्यांनी विचारणा केली असता तुमचा रोड जिल्हा परीषद मधुन मंजुरी करिता पाठवला आहे.आणि सरकार बदल्यामुळे तो रद्ध करण्यात आला आहे. अशी माहिती देण्यात आली आहे.

प्रतिक्रिया.
गेल्या पंधरा वर्षापासून खापरी रस्ता दुर्लक्षित होता पण गेल्या मे 2022 या महिन्यात 2.5 की.मी. पैकी 2 की.मी. रस्त्याचे डांबीकरणाचे काम जिल्हा परिषद मार्फत करण्यात आले आहे. पण उर्वरित अर्धा कि.मी या रस्त्याने पावसाळ्यात पायदळ चालणे सुद्धा कठीण बाब झाली आहे.उखळलेल्या रस्त्यातून चिखल व साचलेल्या पाण्याचा तून दुचाकी तर सोडा पण साधे पायदळ चालणे कठीण झाले आहे. एखाद्याचे आरोग्य बिघडल्यास येथुन तालुक्याच्या ठिकाणी त्याला नेण्यास मोठी कसरत करावी लागत आहे.आणि बाहेरगावी शाळेत ये- जा करणाऱ्या शाळकरी विद्यार्थ्यांना व नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. या गंभीर बाबीची त्वरीत दखल घेण्यात यावी अशी गावकऱ्यांची मागणी आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर