तालुक्यात अनेक शेतकऱ्यांनी केली मिरची पिकाची लागवड.
मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई
[9922862184]
मारेगांव:सध्या मिरचीचे पीक निघाले लागले असून शेतात वाळत घातलेली लाल मिरची लक्ष वेधून घेत आहे.मारेगांव तालुक्यात कापुस व सोयाबीन मोठ्या प्रमाणात घेतले जायचे . परंतु गेल्या दोन तीन वर्ष कपासी वरील बोंडअळीच्या संकटाने उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट व्हायला लागली.त्यामुळं गेल्या दोन तीन वर्षांपासून तालुक्यातील शेतकरी मिरची पिकाकडे वळला आहे.
यावर्षी जवळ जवळ दहा हेक्टर क्षेत्रावर मिरची पिकाची लागवड केल्याचा कृषी विभागाचा अंदाज आहे.बुरांडा,चिंचमंडळ,गोधनी पाथरी,मंगरूळ,हटवांजरी, खापरी,शिवारात मिरची लागवडचे प्रमाण जास्त असल्याचे दिसून येत आहे.पिकली मिरचीचे तोडे सुरु आहे.वाळत घातलेली मिरची लक्ष वेधून घेतात.तोडणीसाठी मजुराचा तुडवडा जाणवत असून मजूरीचे दर वाढले आहेत.
चार पाच रुपये किलो प्रमाणे किंवा १८० ते २०० रुपये मोठ हारा ( डाल ) प्रमाणे मजुरी मोजावी लागत आहे.चार ते पाचशे रुपये एक मजूर दिवसला कमावत आहेत.वाळलेल्या मिरचीची विक्री शेतकरी करत आहे.
सध्या नागपूर कळमना मार्केट ला वाळलेल्या मालाला कमीत कमीत कमी १६ हजार रुपये तर जास्तीत जास्त २३ हजार प्रति क्विंटल दर मिळतो आहे.हा दर टिकून राहीला तर शेतकऱ्यांच लाल होण्याची स्वप्नं नक्कीचं साकार होईल अशी आशा आहे .
