एका दिवसातच लावला चोरीचा छळा.
मारेगांव पोलिसांची धडाकेबाज कारवाई.
मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई
[9922862184]
मारेगाव येथे ऐन मध्यवस्तीतून रात्रीच्या सुमारास तीन बकऱ्या चोरी गेल्या होत्या.बकऱ्या चोरून एक दिवसाचाही कालावधी उलटून जात नाही तोच मारेगाव पोलिसांनी या चोरट्यांना जेरबंद केले आहे.
सविस्तर वृत्त असे की.
मारेगाव येथील प्रभाग क्र.3 मधील राहिवासी संजय कवडुजी तुरारे वय 38 वर्ष यांच्या बकऱ्या घराच्या बाजुच्या टिनाच्या शेड मधून मंगळवार दिनांक 31जानेवारीच्या पाहाटे 3:30 वाजताच्या सुमारास कार मध्ये बकऱ्या चोरी करून नेत असल्याचे शेजाऱ्याच्या लक्षात येताच त्यांनी लगेच ही महिती संजय यांना दिली.
त्यांनी शेड मध्ये जाऊन बगले असता तीन बकऱ्या चोरी गेल्या होत्या.जाची किंमत सुमारे 25 हजार आहे.त्यांनी लगेच या घटनेची तक्रार मारेगाव पोलीस स्टेशन येथे देण्यात आली होती. या घटने नंतर मारेगाव पोलिसांनी वेगाने तपासाची चक्रे फिरवीत सगळीकडे फोन करीत शोधाशोध सुरु केली.
अशातच यवतमाळ येथील स्थानिक गुन्हे शाखेने मारेगाव येथे माहिती दिली की बकऱ्या, दोन आरोपी आणि एक मारोती 800 कार लाल रंगाची MH 34 C 8501 हे चारचाकी वाहन असा मुद्देमाल जप्त केला असल्याची माहिती वरून मारेगाव पोलिसांनी शेळीमालक संजय तुरारे यांना सोबत घेऊन यवतमाळ गाठले.तिथे असलेल्या बकऱ्या पाहुण ह्याच आमच्या बकऱ्या आहेत असे त्यांनी ओळखले.
सोबतच बकऱ्या चोरणारे दोन आरोपी रिच रामदास कोटकर वय 18 वर्ष मंगलम पार्क वणी,सुजल अजय मोरे वय 18 वर्ष साधणकरवाडी वणी,व एक विधी संघर्ष बालक यांना दुसऱ्या दिवसाला दुपारी अटक केली.सुमारे 80 हजाराच्या मुद्देमाल सह तीन आरोपींना मारेगाव ठाण्यात गजाआड केले आहे.
अवघ्या 24 तासांच्या आत चोरीच्या घटनेचा सुगावा लागल्याने मारेगांव पोलिसांचे कौतुक होत आहे.त्यांचेवर कलम 379,34 अन्वये गुन्हा दाखल असून पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पुज्जलवार,ठाणेदार राजेश पुरी यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार आनंद अलचेवार,संजय वारेकर,अफजल पठाण,राजू टेकाम पुढील तपास करीत आहे.
