देशाच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून गावातील ७५ वर्षाच्या नागरिकांचा केला सत्कार.
शिवप्रतिष्ठान हिवरी यांचे वतीने उत्कृष्ट उपक्रम राबविन्यात आला.
सुरेश पाचभाई मारेगाव:- देशाच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून हिवरी गावातील युवकांनी शिवजयंती निमित्त गावातील 75 वर्षाच्या नागरिकांचा सत्कार करून समाजापुढे आदर्श निर्माण केला आहे.

देशात विविध क्षेत्रामध्ये नाविन्य प्राप्त असलेल्या नागरिकांचा सत्कार होत असतो परंतु देशाचा अमृत महोत्सवानिमित्त गावातील 75 वर्षाचा जेष्ठ नागरिकांचा सत्कार करणारा हिवरी हा एकमेव गाव असल्याचे निदर्शनास आलेले आहेत.

ह्या अभिनव उपक्रमाची दखल सर्वत्र घेत असून शिवप्रतिष्ठान हिवरी यांच्यावर मोठ्या प्रमाणात कौतुकाचा वर्षाव होताना दिसून येत आहेत.

सदर कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून गावच्या सरपंच सौ.इंदिराताई पिदुरकर तर शुभम पिंपळकर प्रमुख उपस्थिती म्हणून उपस्थीत होते.तसेच विविध कार्यकारी सहकारी संस्थेचे अध्यक्ष संदीप आस्वले,उपसरपंच अजय राठोड,शाळा समिती अध्यक्ष ईश्वर थेरे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सदर कार्यक्रमाचे संचालन संतोष आस्वले यांनी केले तर आभार प्रदर्शन श्रीकांत भगत यांनी केले. तसेच कार्यक्रमाचे आयोजन शिवप्रतिष्ठान हिवरी मार्फत करण्यात आले होते.

