ब्रेकिंग न्यूज
पुणेकर वाहतूक कोंडीचं टेन्शन सोडा! पाषाण ते कोथरूड अवघ्या 10 मिनिटांत, नेमका प्लॅन काय? ‘ओम नम: शिवाय’चा जप करत पोरानं मैदानात घातला तांडव! मॅच जिंकून दिली, कोण आहे वंश बेदी? पाहा Video Raj Thackeray News | तिसरी मुंबई कुणासाठी? राज ठाकरेंचा सवाल! | Special Report पत्नी अन् लेकरांना सोडून पोटाची खळगी भरण्यासाठी गाठलं महाराष्ट्र; पण कामावर जाताच संदीपसोबत भयंकर घडलं PM Kisan Samman Nidhi : शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! ‘या’ एका चुकीमुळे थांबणार पीएम-किसानचे ६,००० रुपये! 10 सेकंदांचा थरार! लिफ्टमध्ये वर जाताना अचानक बसले भूकंपाचे धक्के, नाशिकमधील घटना CCTV कॅमेऱ्यात कैद CRIME : गँगवॉरने नांदेड हादरलं! दोघं दबा धरून बसले, गाडी पेट्रोल पंपावर वळली अन् सांडला रक्ताचा सडा; इंद्रज… Ravindra Jadeja : ड्रेसिंग रूमममध्ये रविंद्र जडेजाने असं काय केलं की, गंभीर खळखळून हसला; Video आला समोर मारेगावच्या हेमंतची UPSC-CAPF मध्ये दमदार भरारी! Success Story : नोकरीच्या मागे न लागता घेतला व्यवसायाचा निर्णय, बंदिस्त शेळीपालन केलं यशस्वी, वर्षाला 7 लाख…
SP News Maregaon

मारेगाव येथे वंचित बहुजन आघाडीचा आक्रोश मोर्चा

626 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

शेतकरी कर्जमाफी, ओला दुष्काळ जाहीर करण्यासह महाबोधी विहार बौद्धांच्या ताब्यात देण्याची मागणी

सुरेश पाचभाई मारेगाव,

मारेगाव :बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांच्या जयंतीनिमित्त वंचित बहुजन आघाडी, तालुका मारेगाव यांच्या वतीने दिनांक २५ सप्टेंबर रोजी ‘कार्यकर्ता मेळावा व आक्रोश मोर्चा’ चे आयोजन करण्यात आले. या मोर्चात समाजातील विविध स्तरांतील नागरिकांचा मोठ्या संख्येने सहभाग होता.

या मेळाव्यात विविध सामाजिक, धार्मिक आणि शेतकरी विषयक प्रश्नांवर चर्चा झाली. त्यानंतर तहसीलदार मार्फत प्रशासनास मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. प्रमुख मागण्या पुढीलप्रमाणे होत्या :

१) बिहारमधील बोधगया येथील महाबोधी महाविहाराचे व्यवस्थापन तात्काळ बौद्ध धर्मियांकडे सुपूर्द करावे.
२) शेतकऱ्यांचे सर्व प्रकारचे कर्ज सरसकट माफ करून सातबारा कोरा करावा.
३) अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची दखल घेऊन ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत द्यावी.

मोर्चाच्या माध्यमातून शेतकरी आणि सर्वसामान्य जनतेच्या व्यथा मांडण्यात आल्या. शासनाने या मागण्यांवर तात्काळ कार्यवाही करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी आघाडीने मागणी केली.

या निवेदनावर राजेंद्र निमसटकर, ज्ञानेश्वर मुन, अनिल खैरे, अभिषा निमसटकर, यशोधरा लिहीतकर, रेखाताई काटकर, शोभाताई दारुंडे, शितलताई तेलंग, अनंता खाडे, रवींद्र तेलंग, संजय जीवने, शिवदास काबक आदींसह अनेक पदाधिकाऱ्यांनी सही केली.

मोर्चाचे निवेदन तहसीलदारांना सादर करून जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त, मुख्यमंत्री, तसेच कृषी आणि सामाजिक न्यायमंत्री यांना प्रत पाठविण्यात आली आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर