Shopping Cart
Total:

$0.00

Items:

0

Your cart is empty
Keep Shopping

मारेगावच्या आठवडी बाजारात मोबाईल चोरट्यांचा उपद्रव

पोलीस प्रशासन सज्ज तरी चोरट्यांचा उपद्रव सुरूच

नागरिकांनी पण बाजारात जातांना किंमती वस्तू सांभाळुन ठेवणे गरजेचे

सुरेश पाचभाई मारेगाव,

मारेगाव येथे दर मंगळवारला आठवडी बाजार भरत असतो.आठवडी बाजारामध्ये तालुक्यामधील 105 गावातील नागरिकांची बाजार घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी असते.त्याचाच गैरफायदा घेऊन हे भुरटे चोर अनेक जणांच्या खिशातून मोबाईल चोरत असल्याच्या तक्रारी दाखल झाल्या आहे.

मारेगाव हे तालुक्याचे ठिकाण आहे.येथे येथे दर मंगळवारला आठवडी बाजार भरत असतो.त्यासाठी तालुक्यातील कानाकोपऱ्यातून नागरिक बाजारासाठी येतात.मारेगाव येथील बाजारात याआधी अनेकांचे मोबाईल चोरी गेल्याच्या घटना घडलेल्या आहे.तशा प्रकारच्या तक्रारीसुद्धा त्यावेळी दाखल करण्यात आल्या होत्या.यावर आळा घालण्याच्या दृष्टीने पोलीस कर्मचारी बाजारात टेहळणी करीत असतात.

तरीही चोरटे अनेकांच्या खिशातून मोबाईल उडवण्याच्या घटना गेल्या अनेक दिवसापासून घडत आहे.अनेकांनी आपले मोबाईल खिशातून चोरी गेल्याच्या मारेगाव पोलीस स्टेशनला तक्रारी दिल्या आहे. हे भुरटे चोर गर्दीचा गैरफायदा घेऊन अनेकांच्या खिशातून मोबाईल चोरत आहे.आज पर्यंत बरेच जणांचे मोबाईल गेल्याची खमंग चर्चा आहे.त्यापैकी काही जणांनी कमी किमतीचे मोबाईल असल्याने पोलीस स्टेशनला तक्रार दिली नसल्याची माहिती आहे.पण ज्याचे मोबाईल महागडे आहे त्यांनी तक्रारी दाखल केली आहे.तसेच नागरिकांनी बाजारात जातांना किंमती वस्तू सांभाळुन ठेवणे गरजेचे आहे.

प्रतिक्रिया…
पोलीस प्रशासन या भुरक्याचोरट्यांच्या मार्गावर असून हे भुरटे चोर लवकरच गजाआड करण्यात येईल असे आश्वासन मारेगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार शंकर पांचाळ यांनी दिले आहे.

Read Also:
0
Show Comments (0) Hide Comments (0)
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest
0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
Recent Posts:
error: Content is protected !!