काँग्रेसच्या शेतकरी न्याययात्रेत केली मागणी
काँग्रेस तरी विद्यार्थ्यांकडे लक्ष देणार का?
सुरेश पाचभाई मारेगाव,
बस अभावी होणारे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान आणि शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना करावी लागणारी पायपीट ही टाळता यावी यासाठी घोडदरा येथील विद्यार्थ्यांनी चक्क काँग्रेस न्याय यात्रेत जाऊन काँग्रेस पदाधिकाऱ्यांना निवेदन दिले.काँग्रेस तरी या विद्यार्थ्यांना न्याय देईल अशी आशा व्यक्त केल्या जात आहे.
मारेगाव तालुक्यातील घोडदरा येथील अनेक विद्यार्थी विद्यार्थिनी मारेगाव येथे शिक्षणासाठी ये – जा करत असतात. घोडदरा हे गाव मारेगाव पासून अंदाजे सात किमी अंतरावर आहे.येथील अनेक विद्यार्थी व विद्यार्थिनी शाळेत ये – जा करण्यासाठी वाहन नसल्याने त्यांना सुमारे तीन किमी अंतर खडकी बस थांबा पर्यंत पायदळ यावे लागत आहे.येथील ग्रामपंचायत कार्यालय अंतर्गत दिनांक 20 जुन 2024 रोजी ठराव घेण्यात आला असून घेण्यात आलेला ठराव क्रमांक 10 नुसार दिनांक 26 जुन 2024 रोजी राज्य परिवहन मंडळ शाखा वणी यांना निवेदन देण्यात आले.

परंतु संबंधित परिवहन विभागाने घोडदरा येथील विद्यार्थ्यांच्या निवेदनाला केराची टोपली दाखवली.म्हणून दिनांक 10 ऑगस्ट 2024 रोज शनिवारला दुपारी 3 वाजता काँगेसच्या पदयात्राचे खडकी बस थांबा येथे आगमन होताच गावातील विद्यार्थी विद्यार्थिनी तसेच महिला व पालक यांनी मोठ्या संख्येने काँग्रेसच्या रॅलीचे स्वागत केले.आणि विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी लवकरात लवकर बस सेवा सुरू करण्याची मागणी केली.यावेळी काँग्रेसचे पदयात्रेचे आशिष खुलसंगे मारेगाव काँग्रेस तालुका कमिटी अध्यक्ष मारोती गौरकर यांचे सह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
