केंद्र सरकार संचालित पीएमश्री नवोदय विद्यालयात आगामी शैक्षणिक वर्षात सहावी साठीची प्रवेश परीक्षा नुकतीच दर्यापूर शहरातील ३ परीक्षा केंद्रावर शांततेत पार पडली. या परीक्षेसाठी १ हजार ३३८ विद्याथ्यर्थ्यांनी नवोदय प्रवेश परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज भरले होते. त्यापैकी प्रत्यक्षात ३ केंद्रांवर १ हजार १९८ विद्यार्थ्यांनी नवोदय प्रवेश परीक्षेचा पेपर दिला. तर परीक्षेसाठी ३ केंद्रांवरील जवळपास १४५ विद्यार्थ्यांची गैरहजेरी दिसून आली. दर्यापूर शहरातील ३ केंद्रांवरील परीक्षेसाठी तब्बल १ हजार ३३८ विद्यार्थ्यांनी ऑनलाइन अर्ज केल्याने अर्जाची संख्या मागील वर्षीच्या तुलनेत जास्त अर्ज आले होते. त्यामुळे अमरावतीच्या नवोदय विद्यालयात सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षांमध्ये इयत्ता सहावीसाठी होणाऱ्या परीक्षेसाठी मोठी रस्सीखेच होणार आहे. परीक्षा केंद्रावर परीक्षार्थीनी प्रवेशपत्र, परीक्षा लेखन साहित्य व ओळखपत्रासह उपस्थित राहण्याचे आवाहन केले होते. त्यामुळे शनिवारी सकाळी ९ वाजता पासूनच अनेक पालक आपल्या पाल्यांसह शहरात येताना दिसत होते. सकाळी १० वाजता विविध केंद्रावर पालकांसह विद्यार्थ्यांची गर्दी झाल्याचे चित्र दिसत होते. सकाळी १० वाजता पासूनच पालकांनी पाल्यांना सोडण्यासाठी शहरातील परीक्षा केंद्रांवर गर्दी केली होती. थंडीतही केंद्रावर गर्दी थंडीमय वातावरणामुळे आपल्या वाहनातून अनेकजण आल्याने परीक्षा केंद्रासमोर लांब वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. किमान एक तास आधी येण्याच्या सूचना दिल्याने ग्रामीण भागांसह शहरी भागातील पालकांनी सकाळी ९ वाजता पासूनच हजेरी लावली. शंभर गुणांची परीक्षा शंभर गुणांसाठी घेण्यात आलेल्या या परीक्षेत एकूण ८० प्रश्न विचारण्यात आले होते. अर्थात एका प्रश्नासाठी १.२५ गुण होते. तसेच नवोदय परीक्षेचा पेपर सुटल्यानंतरही विद्यार्थ्यांना घेण्यासाठी पालकांची दुचाकी, चारचाकीसह गर्दी दिसून आली.
परिक्षेला 1,198 विद्यार्थी; 145 जणांची दांडी:दर्यापूर शहरातील 3 केंद्रांवर सुरळीतपणे करण्यात आले आयाेजन
-
By सुरेश पाचभाई
- December 17, 2025
📞 Phone: 9922862184
SP न्यूज मारेगांव हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजिटल स्वरूपातील ऑनलाईन
न्युज पोर्टल असून या माध्यमाद्वारे परिसरातील ताज्या घडामोडी व बातम्या,
सामाजिक व राजकीय, विश्लेषणात्मक बातम्या आणि महाराष्ट्र, देश, क्रीडा,
कृषी, मनोरंजन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या
त्वरित जनतेपर्यंत पोहचविण्याचा एकमेव उद्देश आहे.
“घडावा देश, हाच उद्देश… आवाज जनतेचा”
Show Comments (0)
Hide Comments (0)
0
0
votes
Article Rating
Subscribe
Login
0 Comments
Oldest
Newest
Most Voted
Inline Feedbacks
View all comments
Recent Posts:
चिमुकल्या हातांनी पिकवली अन् विकलीही भाजी!:भंडारा जिल्ह्यातील...
2views
0likes
-
By सुरेश पाचभाई
- February 24, 2026
मंत्र्यांनी लक्षवेधीवर बोलताना अभ्यास करून यावे:नुसते बघतो,...
2views
0likes
-
By सुरेश पाचभाई
- February 24, 2026
सरकारची ड्रग्ज बाबत ‘झिरो टॉलरन्स’ पॉलिसी:ड्रग्ज तस्करीत...
2views
0likes
-
By सुरेश पाचभाई
- February 24, 2026
ओबीसी आरक्षणासाठी 50% मर्यादा हटवा, घटनादुरुस्ती करा:बबनराव...
4views
0likes
-
By सुरेश पाचभाई
- February 24, 2026
डिजिटल इंडियाच्या गप्पा अन् जीवघेणा प्रवास:वैनगंगेवरील ‘ईटान-कोलारी’...
3views
0likes
-
By सुरेश पाचभाई
- February 24, 2026
जिल्हा परिषद, पंचाय समितीचे कामकाज ठप्प:हिंगोली जिल्ह्यात...
3views
0likes
-
By सुरेश पाचभाई
- February 24, 2026
विदर्भासाठी राज्य सरकारचे मोठे गिफ्ट:वैनगंगा-नळगंगा नदीजोड प्रकल्पाला...
5views
0likes
-
By सुरेश पाचभाई
- February 24, 2026
सत्ताधाऱ्यांच्या आशीर्वादाने सरकारी तिजोरीवर दरोडा:1985 मध्ये जन्मलेल्या...
3views
0likes
-
By सुरेश पाचभाई
- February 24, 2026
