भाजपचे नेते तथा मंत्री नीतेश राणे यांनी मुंबईत महायुतीची सत्ता आली तर मुंबईचे नाव पुन्हा बॉम्बे होईल हा उद्धव ठाकरे यांचा दावा जोरकसपणे फेटाळून लावला आहे. मुंबईत महायुतीची सत्ता आलाल्यानंतर मुंबईचे नामकरण बॉम्बे होणार नाही, पण उद्धव ठाकरेंची सत्ता आली तर मात्र मुंबईचे मोहम्मद लँड जरूर होईल, असे ते म्हणालेत. नीतेश राणे यांच्या या टीकेमुळे मुंबईतील राजकारण चांगलेच तापले आहे. खासदार संजय राऊत व अभिनेते महेश मांजरेकर यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची एक संयुक्त मुलाखत घेतली होती. या मुलाखतीत उद्धव ठाकरे यांनी भाजपवर मुंबईचे नाव बॉम्बे करण्याचा आरोप केला होता. मुंबईतील मराठी माणसांचे हित व मराठी अस्मितेच्या मुद्यावर प्रचार केंद्रित करून महायुती सत्तेत आल्यास मुंबईचे अस्तित्वच धोक्यात येईल. महायुती मुंबईचे नाव पुन्हा बॉम्बे असे करेल, असे ते म्हणाले होते. मंत्री नीतेश राणे यांनी शुक्रवारी त्यांचा हा दावा जोरकसपणे फेटाळून लावला. मुंबईचे मोहम्मद लँड होईल – नीतेश राणे उद्धव मामु बोलतात की, महायुती सत्तेत आली तर मुंबईचे परत बॉम्बे करून टाकतील. हे तर शक्यच नाही. पण उद्धव मामु सत्तेत आले तर मुंबईचे मोहम्मद लँड नक्कीच करून टाकतील, असे नीतेश राणे शुक्रवारी आपल्या एका ट्विटमध्ये उद्धव ठाकरेंवर हल्ला चढवत म्हणाले. उद्धव ठाकरेंमुळे मुंबईत बांगलादेशी, रोहिंगे वाढले नीतेश राणे यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीतही उद्धव ठाकरे यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना वेगळी होती आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना वेगळी आहे. मराठी माणूस, हिंदू समाजाला मुंबईत सुरक्षित ठेवण्याचे काम बाळासाहेब ठाकरे यांनी केले. पण त्यांच्यानंतर पुढच्या पिढीने नेमका विरोधाभास केला. पूर्वी शिवसेना आहे म्हणून मुंबई आहे असे म्हटले जात होते. पण आता उद्धव ठाकरे आहेत म्हणून बांगलादेशी व रोहिंगे आहेत असे नवे समीकरण तयार झाले आहे. टिस्सच्या अहवालानुसार उद्धव ठाकरे यांचे राज्य असलेल्या मुंबईत बांगलादेशी व रोहिंगे वाडत चालले आहेत. 2030 पर्यंत हा टक्का अधिकच वाढण्याची भिती आहे, असे नीतेश राणे म्हणाले आहेत. आत्ता पाहू काय म्हणाले होते उद्धव ठाकरे? उद्धव ठाकरे यांनी आपल्या मुलाखतीत भाजपचा मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करण्याचा डाव असल्याचा आरोप केला होता. ते म्हणाले होते, मुंबई महाराष्ट्रापासून कुणीही तोडू शकत नाही, पण आज मुंबईची संस्कृती मारली जात आहे. कुणीही येते आणि सांगत की इथल्या भागाची भाषा ही गुजराती आहे. आमच्यावर हिंदी सक्ती करणार, आमची अस्मिता, संस्कृती मारणार आणि नावाला मुंबई महाराष्ट्रामध्ये ठेवणार तर या गोष्टीला काही अर्थ नाही. बस म्हटले की बस आणि उठ म्हटले की उठ म्हणणारी ही लोक आहेत. त्यांच्यावर काय विश्वास ठेवायचा?, असे ते भाजपच्या राज्यातील नेत्यांवर निशाणा साधताना म्हणाले होते.
ठाकरेंची सत्ता आली मुंबईचे मोहम्मद लँड होईल:नीतेश राणेंची ठाकरे बंधूंवर जहरी टीका; मुंबईचे नाव बॉम्बे होणार असल्याचा दावा फेटाळला
-
By सुरेश पाचभाई
- January 9, 2026
📞 Phone: 9922862184
SP न्यूज मारेगांव हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजिटल स्वरूपातील ऑनलाईन
न्युज पोर्टल असून या माध्यमाद्वारे परिसरातील ताज्या घडामोडी व बातम्या,
सामाजिक व राजकीय, विश्लेषणात्मक बातम्या आणि महाराष्ट्र, देश, क्रीडा,
कृषी, मनोरंजन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या
त्वरित जनतेपर्यंत पोहचविण्याचा एकमेव उद्देश आहे.
“घडावा देश, हाच उद्देश… आवाज जनतेचा”
Show Comments (0)
Hide Comments (0)
0
0
votes
Article Rating
Subscribe
Login
0 Comments
Oldest
Newest
Most Voted
Inline Feedbacks
View all comments
Recent Posts:
परिवहन विभागात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार:बदल्या, बेकायदेशीर वसुलीचे...
2views
0likes
-
By सुरेश पाचभाई
- March 26, 2026
सोशल मीडियावर अश्लील क्लिप्स टाकणाऱ्यांना धक्का, ग्रुपच्या...
2views
0likes
-
By सुरेश पाचभाई
- March 26, 2026
भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाशी उद्धव ठाकरेंच्या ‘मातोश्री’...
2views
0likes
-
By सुरेश पाचभाई
- March 26, 2026
पार्थ पवारांना क्लीन चिट देता येणार नाही:राजकारणासाठी...
2views
0likes
-
By सुरेश पाचभाई
- March 26, 2026
राज्यात यलो अलर्ट, पुढचे चार दिवस धोक्याचे:मराठवाड्यातील...
2views
0likes
-
By सुरेश पाचभाई
- March 26, 2026
रुपाली चाकणकरांमुळे पक्षाची प्रतिमा धोक्यात:महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा...
2views
0likes
-
By सुरेश पाचभाई
- March 26, 2026
राज्यभरात राम नवमीचा उत्साह:पुण्यात वाहतुकीतील बदल, काळाराम...
2views
0likes
-
By सुरेश पाचभाई
- March 26, 2026
