कळंब (ता. प्रतिनिधी) : नितेश क्षीरसागर
कळंब शहरातील इंदिरा चौक परिसरात राहत्या घरी गळफास घेऊन ५५ वर्षीय व्यक्तीने आत्महत्या केल्याची घटना रविवारी (दि. १ फेब्रुवारी २०२६) रात्री साडेआठच्या सुमारास उघडकीस आली.
आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव कैलास किसानराव बावणे (वय ५५, रा. कळंब, ता. कळंब, जि. यवतमाळ) असे आहे. त्यांनी राहत्या घरी गळफास घेतल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास आले आहे. आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
मयत कैलास बावणे यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी व दोन मुले असा आप्त परिवार आहे. घटनेची माहिती मिळताच कळंब पोलिस घटनास्थळी दाखल झाले व घटनास्थळ पंचनामा करून त्याचा. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालय, कळंब येथे पाठविण्यात आला.
या प्रकरणाचा पुढील तपास ठाणेदार राजेश राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली कळंब पोलीस करीत आहेत.
