राज्यातील 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी आज मतदान सुरू आहे. छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव, लातूर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांत ही प्रक्रिया पार पडेल. अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळे ५ फेब्रुवारी रोजी होणारे हे मतदान आजपर्यंत पुढे ढकलण्यात आले होते. आज सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत मतदान होईल. त्यानंतर 9 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वाजता मतमोजणीला सुरुवात होईल. प्रत्येक मतदाराला पांढऱ्या ईव्हीएमवर जिल्हा परिषदेसाठी आणि गुलाबी ईव्हीएमवर पंचायत समितीसाठी अशी दोन मते द्यायची आहेत. एकूण 2 कोटींहून अधिक मतदार असून 25,471 मतदान केंद्रे उभारण्यात आली आहेत. जिल्हा परिषदेच्या 731 गटांसाठी व पंचायत समितीच्या 1,462 गणांसाठी असे एकुण 7,438 उमेदवार रिंगणात आहेत.
