जनाब संजय राऊत भाजपचा झेंडा हा हिंदूत्ववादाचा आणि मराठी असल्याने जनतेला आम्हाला स्वीकारले आणि आम्ही मराठी महापौर केला. तुमचा झेंडा हिंदूत्वाच्या विरोधात आणि अजेंडा औरंगजेब आणि अफजल खानाचा होता म्हणून मुंबईकरांनी तुम्हाला नाकारले आहे, असे भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन यांनी म्हटले आहे. नवनाथ बन म्हणाले की, उबाठाच्या हिरव्या अजेंडाला नाकारण्याचे काम जनतेने केले आहे. भाजप कायमच मुंबईत हिंदू आणि मराठी महापौर होणार हे सांगत होती. आणि आम्ही दिलेला शब्द पाळला. तुम्हाला पाकिस्तान आणि बांगलादेशधार्जिणा महापौर करायचा होता. तुमचा झेंडा द्वेषाचा अन् अजेंडा औरंगजेबाचा आहे हे मुंबईकरांनी ओळखले आहे. रितू तावडे या भाजपच्या कार्यकर्ता आहेत त्या कुठल्या पक्षातून आल्या ते सांगण्यापेक्षा संजय राऊत तु्म्ही कुठल्या पक्षातून आलात याचा विचार करा. तुम्ही किती वैचारिक सुंता झालेले आहात हे महाराष्ट्राला ठाऊक आहे. राऊतांच्या पोटात दुखायला लागले नवनाथ बन म्हणाले की, मुंबईतील बांगलादेशी घुसखोराच्याविरोधात रितू तावडे यांनी भूमिका घेतल्यानंतर लगेच संजय राऊत यांच्या पोटात दुखायला लागले. बांगलादेशींना बोहर काढू म्हटल्यावर राऊतांना एवढी अडचण का होते. तुम्हाला त्यांचा पुळका का येत आहे, त्यांच्या जीवावर मनपा जिंकायची हे तुमचे धोरण होते ते मुंबईकरांनी ओळखले आणि तुम्हाला घरी बसवले. त्यांना आम्ही मुंबईच्या बाहेर काढण्याचे काम करत आहोत. आमच्याकडून त्यांना एकही रुपया दिला जात नाही. केंद्र सरकार, राज्य सरकार आणि मुंबई मनपा बांगलादेशी घुसखोरांना बाहेर काढतो आहोत. तुम्हाला त्यांच्या जीवावर सत्ता स्थापन करायची आहे. उबाठाची हिंदूविरोधी भूमिका नवनाथ बन म्हणाले की, हिंदू मंदिरांची तुम्हाला कधी पासून चिंता लागायला लागली असा सवाल राऊतांना केला आहे. काही दिवसांपासून तुम्ही आजान स्पर्धा, नमाज पठण करणे, हिंदूविरोधी भूमिका घेणे, देशविरोधी पाकिस्तानधार्जिणी भूमिका घेण्याचे काम उबाठाकडून सुरू आहे. पण आम्ही बांगलादेशी घुसखोरांना बाहेर काढण्याचे काम करणार आहोत. संघात हिंदू-मुस्लिम नाही नवनाथ बन म्हणाले की, आरएसएसच्या कार्यक्रमात देशभक्तांचे स्वागत असते तिथे हिंदू-मुस्लीम द्वेष करत नाही. जे राष्ट्रसाठी काम करत असतात त्यांचे तिथे स्वागत करण्यात येते. राऊत बांडगे झाले आहात.