छत्रपती संभाजीनगरसह राज्यातील १२ जिल्हा परिषदा आणि त्याअंतर्गत येणाऱ्या १२५ पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी शनिवार, ७ फेब्रुवारी रोजी उत्साहात मतदान पार पडले. राज्य निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार, राज्यात एकूण ६८.२८% मतदान झाले. सकाळी १० वाजता मतमोजणीस सुरुवात झाली आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव व लातूर या जिल्ह्यांतील १२ जिल्हा परिषदेच्या ७३१ गण आणि पंचायत समित्यांच्या १,४६२ गटांसाठी एकूण ७,४३८ उमेदवाराचे भवितव्य येत्या काही तासांत ठरणार आहे.