Shopping Cart
Total:

$0.00

Items:

0

Your cart is empty
Keep Shopping

राहुल गांधींची धास्ती सरकारला नाही, काँग्रेसलाच:राऊतांनी इंडिया आघाडीचे लक्तर वेशीवर टांगले, जनतेनं आघाडीला नाकारले- बन

सरकारने नव्हे तर काँग्रेस कार्यकर्त्यांनी राहुल गांधी यांची धास्ती घेतली आहे. राहुल गांधी यांची धास्ती सोनिया गांधी यांनी घेतली आहे, भाजपला धास्ती घेण्याची काही गरज नाही. जो पर्यंत राहुल गांधी इंडिआ आघाडीचे नेतृत्व करतील तो पर्यंत काँग्रेसला आणि आघाडीला अच्छे दिन येणार नाही, असे भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी म्हटले आहे. नवनाथ बन म्हणाले की, राहुल गांधींकडे जर नेतृत्व असेल तर आपल्याला कधीही यश मिळणार नाही हे इंडिआ आघाडीच्या सर्व नेत्यांना माहिती आहे. म्हणूनच ममता बॅनर्जी, स्टॅलीन, उद्धव ठाकरेंचे नाव पुढे केले जाते. राहुल गांधी स्व:तचे कमकुवत नेतृत्व वेळोवेळी सिद्ध करण्याचा प्रयत्न करतात. 2009 पासून 2024 पर्यत त्यांचा काहीही उपयोग झाला नाही. महाराष्ट्रात काँग्रेसचे नेतृत्व टिपू सुलतानकडे नवनाथ बन म्हणाले की, राहुल गांधी यांच्या नेतृत्वात देशभरात काँग्रेस खड्ड्यात गेलेली आहे. संजय राऊत त्यांचे लांगुनचालन करत असतात. काँग्रेसला एकत्र ठेवण्याचा प्रयत्न राऊतांकडून सुरू आहे ते केवळ राज्यसभेची खासदारकी आपल्याला मिळावी म्हणून हे प्रयत्न राऊतांकडून सुरू आहे.काँग्रेस एकटी राहिली आणि एकत्र झाली तरी त्यांच्यानेतृत्वात निवडणूक जिंकता येऊ शकत नाही. कारण सपकाळांसारखे टिपू सुलतान त्यांच्याकडे बसलेले आहेत. टिपू सुलतानच्या नेतृत्वात महाराष्ट्र काँग्रेसचे काही होणार नाही. ..तर देशात भोपळा मिळेल नवनाथ बन म्हणाले की, इंडिआ आघाडीमध्ये बेबनाव होता तो समोर आणण्याचे काम संजय राऊत यांच्यामाध्यमातून केले जात आहे. राऊतांनी आघाडीची मोट कितीही बांधण्याचा प्रयत्न केला तरी ती बांधली जाणार नाही कारण ही आघाडी काही विचारांवर बांधलेली आघाडी नाही ही केवळ खुर्चीसाठी तयार केलेली आहे. येणाऱ्या काळात आघाडीच्या ठिकऱ्या उडणार आहेत. इंडिया आघाडीमध्ये कोण नेतृत्व करणार हे निश्चित होत नाहीये. राहुल गांधी यांचे नेतृत्व स्वीकारायला कुणी तयार नाही. पश्चिम बंगाल म्हणतंय की ममता बॅनर्जीनी नेतृत्व करावे, काही जण स्टॅलिन यांनी नेतृत्व करावे असे मत मांडले आहे, माझे संजय राऊत यांना आवाहन आहे की उद्धव ठाकरेंचे नेतृत्व पुढे करावे जसे महाराष्ट्रात भोपळा मिळाला तसा देशभरात आघाडीला भोपळा मिळेल. इंडिआ आघाडी केवळ सत्तेसाठीची नवनाथ बन म्हणाले की, इंडिया आघाडीचं अस्तित्व फक्त निवडणुकीपुरतंच आहे. हे सत्तेसाठी एकत्र आलेले लोकं आहेत त्यांचा काहीच अजेंडा नाही. केवळ भाजपला विरोध करण्यासाठी ही सर्व मंडळी एकत्र आली आहेत. देशभरातील जनतेने त्यांना नाकारले आहे. राऊतांनी कितीही लोकांना एकत्र करण्याचा प्रयत्न केला तरी ते एकत्र येऊ शकणार नाही. मविआ विधानसभेला एकत्र असताना आम्ही तुम्हाला पराभूत केले आणि बहुमत घेत सत्तेत आलो. तुम्ही 90 जागा लढले आणि 20 जागा जिंकल्या, काँग्रेस, राष्ट्रवादीची हीच परिस्थिती होती. पण आम्हाला जनतेने साथ दिली. तुम्ही कोणाला जरी सोबत घेतले असते तरीही जनतेने आम्हालाच पाठिंबा दिला असता.

Read Also:
0
Show Comments (0) Hide Comments (0)
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest
0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
Recent Posts:
error: Content is protected !!